AI Eduaction : केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय! तिसरीपासूनच AI शिक्षण, देशभरात १ कोटी शिक्षकांना ट्रेनिंग

AI Education : सध्या जगभरात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर झपाट्याने वाढत आहे. लहान मुलांपासून ते प्रौढांपर्यंत सर्वजण एआयच्या माध्यमातून कामं अधिक वेगानं आणि सुलभपणे पार पाडताना दिसत आहेत. काही सेकंदांत मोठमोठ्या गोष्टी तयार करणाऱ्या या तंत्रज्ञानाचं महत्त्व लक्षात घेऊन आता केंद्र सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

आता शालेय विद्यार्थ्यांनाही एआय शिकवले जाणार असून, तिसरीपासूनच त्यांच्या अभ्यासक्रमात एआयचा समावेश केला जाणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना भविष्यातील डिजिटल जगासाठी तयार करण्याचा केंद्राचा उद्देश आहे.

Mumbai : गोळीबाराची धमकी देत पालकांकडे १ कोटींची मागणी! पाटणकर आजींनी रोहित आर्यबद्दल केला मोठा खुलासा

या निर्णयानुसार २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून देशभरातील सर्व केंद्र, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील शाळांमध्ये एआय शिक्षणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यासाठी आयआयटी मद्रासचे प्राध्यापक कार्तिक रमण यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती स्थापन करण्यात आली असून ती संपूर्ण अभ्यासक्रमाची रूपरेखा ठरवणार आहे.

तसेच, सुमारे १ कोटी शिक्षकांना एआयविषयक विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे, जेणेकरून ते विद्यार्थ्यांना नव्या युगातील कौशल्ये प्रभावीपणे शिकवू शकतील. सध्या देशातील सुमारे १८ हजारांहून अधिक सीबीएसई शाळांमध्ये एआयशी संबंधित विषय शिकवले जात आहेत.

नवीन पिढी तंत्रज्ञान झपाट्याने आत्मसात करते, आणि अशा विद्यार्थ्यांना एआयविषयक शिक्षण देणे म्हणजे भविष्यातील डिजिटल अर्थव्यवस्थेसाठी मजबूत पाया घालण्याचं पाऊल ठरणार आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *