
Sandip Deshpande on Mira Bhayandar MNS Morcha : मीरा भाईंदरमध्ये मनसेकडून आज मोर्चाचे आयोजन कऱण्यात आले आहे. अमराठी व्यापाऱ्याला प्रत्युत्तर म्हणून मनसेकडून आजचा मोर्चा काढण्यात येणार आहे. पण या मोर्चाआधीच मनसेचे संदीप देशपांडे आणि शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मोर्चा काढू नये त्यामुळे पोलिसांकडून मनसे नेत्यांना नोटीस पाठवण्यात आली होती. पण मनसे मोर्चावर ठाम असल्याचे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. अमराठी व्यापाऱ्यांना मोर्चासाठी परवानगी दिली जाते, पण मराठी माणसाला मोर्चाची परवानगी दिली जात नाही, असे संदीप देशपांडे यांनी टीका केली. संदीप देशपांडे यांनी मीरा भाईंदर प्रकरणावरून राज्य सरकारवर टीका केली. मराठी आणि अमराठी असा वाद लावला जातोय, असा आरोपही यावेळी त्यांनी केली.
मीरा भाईंदरमध्ये पोलिसांची दडपशाहीच आहे. एकीकडे व्यापाऱ्यांना पोलिासांनी खुली सुट द्यायची आणि मराठी माणसाला आत टाकायचं. सरकारला याचे परिणाम भागावे लागतील, असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला. भाजप नेत्यांकडून महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही यावेळी देशपांडे यांनी केला आहे. अविनाश जाधव आणि मनसेच्या कार्यकर्त्यांना आज पहाटे पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मीरा भाईंदर मोर्चा होणार की नाही? याबाबत मनसैनिकांच्या मनात संभ्रम होता. पण संदीप देशपांडे यांनी कोणत्याही परिस्थितीत हा मोर्चा होईलच, असे स्पष्ट केले.
अविनाश जाधव यांच्यासह आमच्या अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पण मीरा भाईंदरमध्ये मोर्चा निघणारच. आज होणाऱ्या मोर्चाचे नेतृत्व सामान्य मराठी माणूस करेल. मराठी माणसाच्या नेतृत्वात आजचा मोर्चा निघेल. मोर्चा मराठी माणसासाठी होता, त्यामुळे हा मोर्चा मराठी माणूस काढेल. सामान्य मराठी माणूस मोर्चाचे नेतृत्व करेल. मराठी माणासांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होतोय. काहीही झाले तरी आजचा मीरा भाईंदरमधील मोर्चा निघणारच, असे संदीप देशपांडे यांनी सांगितले. दरम्यान, मराठीचा अपमान केल्यामुळे मीरा भाईंदरमध्ये ती घटना घडली. आम्ही काही कुणालाही मराठी येत नाही म्हणून मारत नाही. आमचा हिंदीला कोणताही विरोध नाही. पण मराठीचा अपमान सहन केला जाणार नाही, असे संदीप देशपांडे यांनी सांगितले.
भाजपचे नेते प्रक्षोभक विधाने करतात, त्यांना महाराष्ट्रात दंगली घडवून आणायच्या आहेत. पण आम्हाला महाराष्ट्र शांत ठेवायचा आहे. आम्ही असल्या कोणत्याही घाणेरड्या वृत्तीला बळी पडणार नाही. महाराष्ट्रात मराठी विरूद्ध अमराठी असा वाद निर्माण करण्याचे भाजपकडून षडयंत्र रचले जात आहे. त्याला आम्ही बळी पडणार नाही. बिहार निवडणुकीत फायदा व्हावा, त्यामुळे महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. दुबेसारख्या लोकांना महाराष्ट्रात दंगली घडवायच्या आहेत आहे. बिहारमध्ये बसून महाराष्ट्राबद्दल बोलणार आहे. महाराष्ट्रातील वातावरण खराब व्हावे, याचं भाजपचे षडयंत्र आहे. भाजपने आतापर्यंत दंगली घडवूनच निवडणुका जिंकल्या आहेत. मराठी-अमाराठी वाद पेटवण्याचा प्रयत्न होत असेल तर सरकारने कारवाई करावी. दुबेसारख्यांनाही सरकारने सांगायला हवे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




