
Pune : मध्य प्रदेशचे इंदूर हे शहर सलग सात वेळा स्वच्छ सर्वेक्षणात भारतातील पहिला क्रमांक मिळवणारे एकमेव शहर आहे. या शहराने असा काय केलं आणि इथले नागरिकांनी प्रशासनाला कसा हातभार लावला आहे हे पाहण्यासाठी पुण्यातील ३०० जणांच्या शिष्टमंडळाने इंदूरला भेट दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही महिन्यांपूर्वी नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन त्यांना मतदारसंघात सर्वोत्तम विकासकामे करण्यासाठी अभ्यास दौरा करण्याचा सल्ला दिला होता. याचनिमित्ताने स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसबा अभियानांतर्गत आमदार हेमंत रासने यांच्या नेतृत्वात ३०० जणांचे शिष्टमंडळ यांनी २ दिवसाचा इंदूर दौरा केला.
पहिल्या दिवशी या शिष्टमंडळाने इंदूरमधील नेपरा रिसोर्स मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि एव्हर एन्विरो बायोगॅस या कचरा पुनर्चक्रीकरण (रिसायकलिंग) प्रकल्पास भेट दिली. यावेळी पुणे महापालिकेच्या अधिकारी, सफाई कर्मचाऱ्यांनी तसेच कचऱ्याचे विघटन आणि त्यातून निर्माण होणाऱ्या उपयुक्त गोष्टी याची प्रक्रिया समजून घेतली.
दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी या शिष्टमंडळाने इंदूरचे महापालिका आयुक्त शिवम वर्मा आणि अतिरिक्त आयुक्त यांची भेट घेतली. घरोघरी जाऊन पालिकेचे कर्मचारी कचरा कसा गोळा करतात, कचऱ्याचे वर्गीकरण कसं केलं जातं, सफाई कर्मचाऱ्यांवर प्रशासनाकडून कसे नियंत्रण ठेवले जाते, स्वच्छतेच्या बाबत इतर महत्त्वाच्या घटकांबाबत सुद्धा यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.
पुणे महापालिकेचे आयुक्त थेट इंदूरमध्ये
पुणे महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांनी आज मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये जात कचरा गोळा करणे, कचऱ्याचे पुनर्चक्रीकरण, कचऱ्याचे व्यवस्थापन आणि वर्गीकरण यासारख्या गोष्टींचा आढावा घेतला. सलग ७ वर्षांपासून भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून इंदूरला मान मिळतोय. स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसबा अभियानांतर्गत आमदार हेमंत रासने यांच्या नेतृत्वात ३०० जणांचे शिष्टमंडळ सुद्धा यावेळी आयुक्तांच्या सोबत होते. माध्यमांशी संवाद साधताना, भोसले म्हणाले, "इंदूर महापालिकेने लोकांमध्ये जाऊन कचऱ्याच्या बाबत एक प्रबोधन केलं आहे. घराघरातील कचऱ्याचे ६ भागात वर्गीकरण केलं जातं. यावर दंडात्मक कारवाई आहे पण तत्पूर्वी इथल्या प्रशासनाने तेवढी सेवा सुद्धा तत्परतेने दिली आहे. इंदूर मॉडेलचा आढावा घेऊन त्याचा फक्त अहवाल येऊन पडेल असं होणार नाही पण त्याची अंमलबजावणी केली जाईल असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केलाय."
|
|
कचऱ्याच्या गाड्यांवर लक्ष ठेवण्यासाठी कंट्रोल रूम
इंदूर शहरात इंटिग्रेटेड सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट सेंटर या ठिकाणी स्मार्ट सिटी अंतर्गत एक कमांड सेंटर उभारण्यात आलेलं आहे. या ठिकाणी कचरा गोळा करण्यासाठी शहरातील ४७० पेक्षा अधिक वाहनांवर एका सॉफ्टवेअरच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाते. २५ पेक्षा अधिक कर्मचारी या कमांड सेंटरमध्ये काम करतात. काम करत असलेल्या कर्मचाऱ्याला प्रत्येक व्हॅनचा मार्ग माहित असतो. गाडीचा वाहक कोण आहे, ती व्हॅन नेमकी कधी थांबते, कचरा गोळा करायला किती वेळ लावते तसेच ती गाडी वेळेत पोहचली आहे का अशा अनेक गोष्टींवर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक वाहनाला जी पी एस ट्रॅकर बसवले आहेत. २०१८ मध्ये हे कमांड सेंटर काम सुरू झाले. कोणत्याही मार्गावर बिघाड, रस्ता बंद असल्यास किंवा चालकाची तब्येत ठिक नसल्यास याबाबत सुद्धा माहिती या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मिळते
इंदूर शहरात दररोज स्वच्छतेचे सर्वेक्षण
महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि येथील नागरिकांच्या सहकार्यामुळेच इंदूर सलग ७ वेळा देशातील सर्वात स्वच्छ शहर बनले आहे, असं प्रतिपादन इंदूरचे महापालिका आयुक्त शिवम वर्मा यांनी केलं आहे. वर्मा म्हणाले, "शहरातील प्रत्येक घरातून कचऱ्याचे वर्गीकरण केलं जातं त्यानंतर ते गोळा होऊन पुढे त्या त्या प्रकारच्या प्रकल्पांमध्ये जाऊन त्यावर कार्यवाही केली जाते. फक्त शहरातच नव्हे तर अगदी झोपडपट्टीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने नागरिकांची कचऱ्याबद्दल भूमिका स्पष्ट आहे." "शहर स्वच्छ राहावे यासाठी जसे अनेक संस्था सर्वेक्षण करतात तसं आमच्याकडून दररोज शहराचे सर्वेक्षण केलं जातं. फक्त कचऱ्याचे नाही तर रस्त्यावर सुशोभिकरण, समाज प्रबोधन याबाबत अनेक उपायोजना आम्ही राबवतो," असं ही ते म्हणाले. रस्त्यांवर थुंकणाऱ्या नागरिकांकडून प्रत्येक महिन्याला ३ लाख रुपये दंड वसूल केला जात असल्याची माहिती सुद्धा आयुक्तांनी यावेळी दिली.
पुण्यातील कसबा मतदारसंघापासून इंदूर पॅटर्नची सुरुवात
इंदूरची स्वच्छता त्याबरोबरच येथील नागरिकांचा या मोहिमेत यात असलेला सहभाग या शिष्टमंडळाने अनुभवला. रोल मॉडेल म्हणून कसबा विधानसभा मतदारसंघात इंदूर पॅटर्नची सुरुवात लवकरच होईल. या पॅटर्न बद्दल सातत्याने आम्ही पुढाकार घेऊन आपण जो प्रयत्न केला जो संकल्प केला आहे त्याला सिद्धीस आणणार आहोत, पुढील तीन ते चार महिन्यात याची अंमलबजावणी होईल याच्याशी आम्ही प्रयत्नशील आहोत असा विश्वास आमदार हेमंत रासने यांनी व्यक्त केला.
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!




























Subscribe to my channel




