
Wardha : वर्धा जिल्ह्यातील भूगर्भातील जलसाठ्यांपैकी ७.१ टक्के जलसाठ्यांमध्ये नायट्रेट आढळून आला आहे. पाणीपुरवठा विभागाने केलेल्या चाचण्यांमधून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांत जिल्ह्यातील नैसर्गिक जलस्त्रोत प्रदूषित होऊन त्याचा आरोग्यावर घातक परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
भूजल सर्वेक्षण आणि वर्धा जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत पाणी गुणवत्तेची वेळोवेळी तपासणी केली जाते. जलस्त्रोतांमध्ये सुधारणा करणे ही तांत्रिक बाब देखील पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडून करणे अपेक्षित असते. पण मागील एका वर्षात ४२ गावात नायट्रेटचे प्रमाण असताना यावर ठोस पावले उचलली गेली नाही. आता त्याबाबतचा अहवाल समोर आला असून पाणी पुरवठा विभागाकडून पुन्हा पाणी तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
१३३० स्त्रोतांची तपासणी
वर्धा जिल्ह्यातील ५२० ग्रामपंचायतींतर्गत येणाऱ्या ८८० गावातील १ हजार १४४ जलस्त्रोतांपैकी १ हजार ३३० स्त्रोतांचे स्मॅपल घेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. २०२४-२५ या वर्षात मान्सूनपूर्व आणि मान्सून पश्चात पाणी नमुने प्रयोगशाळेतून तपासण्यात आले. यात तपासणी अहवालानुसार ४२ गावांतील ९५ स्त्रोतांमध्ये नायट्रेटचे प्रमाण आढळून आल्याची धक्कादायक बाब उजेडात आली.
|
|
वर्धा व सेलू तालुक्यात सर्वाधिक नायट्रेट
सेलू तालुक्यातील ३५ स्त्रोतांमध्ये १७.२ टक्के आणि वर्धा तालुक्यातील ३५ स्त्रोतांमध्ये १६.९ टक्के म्हणजेच सर्वाधिक नायट्रेटचे प्रमाण आढळून आले. तसेच कारंजा आणि समुद्रपूर तालुक्यातील काही गावांमध्ये जलस्त्रोतांमध्ये नायट्रेटचे प्रमाण आढळून आले आहे. नायट्रेटमुळे लहान मुले, गर्भवती महिला आणि आरोग्याने कमकुवत असलेल्या व्यक्तींना गंभीर धोका असल्याचे सांगण्यात आले आहे. नायट्रेटमुळे त्वचारोग, ब्लू बेबी सिंड्राेम, नवजात बालकांत श्वसनाचे आजार एवढच नव्हे, तर कँसर आणि थायरॉईडचा धोका सुद्धा आहे.
स्रोत बंद करण्याचा सूचना
भूजल सर्वेक्षण विभागाच्या अहवालानुसार वर्धा जिल्ह्यातील तब्बल ४२ गावांमध्ये ९५ स्त्रोतांतील पाणी पिण्यासाठी योग्य नसल्याने हे स्त्रोत लवकरात लवकर बंद करणे अथवा यात सुधारणा करणे आवश्यक झाले आहे. ४२ गावांमध्ये पिण्याच्या पाण्यात ४५ पीपीएमपेक्षा जास्त नायट्रेट आढळून आले आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




