
Maharashtra : गेल्या काही दिवसांपासून राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सातत्याने देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करत आहेत. १०० कोटी रुपयांच्या कथित वसुलीप्रकरणात आपल्याला अडकवण्यामागे देवेंद्र फडणवीसांचा हात आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, अनिल देशमुखांचा या आरोपांना आता देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
देवेंद्र फडणवीस हे नुकताच एबीपी माझाच्या ‘माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन’ या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यादरम्यान, त्यांना अनिल देशमुखांच्या आरोपांबाबतही विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना, मनसुख हिरेनची हत्या होणार हे अनिल देशमुखांना माहिती होतं की नव्हतं? याच उत्तर आधी त्यांनी द्यावं, असा प्रश्न त्यांनी विचारला.
नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
“अनिल देशमुख यांनी परवा ट्वीट केलं आणि सांगितलं त्यांना तुरुंगात मोठा त्रास झाला. आता ते तुरुंगात कधी गेले, तर ते नोव्हेंबर २०२२ मध्ये, तेव्हापासून ते ११ महिने तुरुंगात होते. त्यापैकी आठ महिने त्यांचे सरकार होतं. मग त्यांच्याच सरकारने त्यांना त्रास दिला का? असा प्रश्न निर्माण होतो. मुळात अनिल देशमुखांनी आताच हे बोलणं का सुरु केलं? असाही प्रश्न आहे. खरं तर काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी एक योजना तयार केली होती. देवेंद्र फडणवीसांना बदमान करायचं हा योजनेचा मुख्य उद्देश होता. त्यातून एक दिवस कपोलकल्पीत कथा अनिल देशमुखांनी सुरु केली. आणि आता त्याचं पुस्तक लिहिलं”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
|
|
“मनसूख हिरेनची हत्या होणार हे त्यांना माहिती होतं की नव्हतं?”
“जर तुम्ही न्यायालायाचा निर्णय वाचला, तर त्यात सगळंच स्पष्ट होईल. अनिल देशमुखांवर आरोप लावणारे त्यांचे आयुक्त होते. त्याची दखल मुख्य न्यायाधीशांनी घेतली. त्यांनी यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यास सांगितलं. गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायालय सांगितलं की पोलीस गुन्ह्याचा तपास नीट करत नाही. त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे गेलं. हे सगळं महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये घडलं. हे सगळं होत असताना माझा अनिल देशमुखांना एकच प्रश्न आहे , तो म्हणजे मनसूख हिरेनची हत्या होणार हे त्यांना माहिती होतं की नव्हतं? मी सदनात याची माहिती दिली होती. मनसूख हिरेनला गायब करण्यात आलं असून त्याची हत्या होऊ शकते, असा संशय मी व्यक्त केला होता. त्यानंतर त्याची हत्या झाल्याचं समजलं”, असेही ते म्हणाले.
शहर
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- 'एक राष्ट्र, एक निवडणूक' वर मंथन: १० आणि ११ जुलै रोजी गोव्यात संसदीय समितीची दोन दिवसीय बैठक
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- पावसाची विश्रांती! पूर ओसरणार, नागरिकांना दिलासा, हवामान विभागाचे ताजे अपडेट
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
गुन्हा
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- RTO विभागातील भ्रष्टाचाराची SIT द्वारे होणार चौकशी; दोषींवर होणार कठोर कारवाई!
- पुणे: व्हॉट्सॲप चॅटमध्ये गुपिते उघड चॅटमध्ये सिया आणि चेतन यांनी एकमेकांशी केलेल्या 'सिक्रेट लग्ना' बद्दल माहिती
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
- व्हॉट्सॲपवरूनच बनवा आयुष्मान कार्ड; केंद्र सरकारचा ‘आयुष्मान सारथी’ चॅटबॉट लाँच!
- आज ७ जुलै रोजी या राशींवर बरसेल धन, वाचा तुमचे आर्थिक भविष्य
- पावसाळ्यातील फंगल इन्फेक्शनपासून राहा सुरक्षित; त्वचेच्या आरोग्यासाठी 'या' सोप्या टिप्स नक्की फॉलो करा!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
देश विदेश
- भारत-इंग्लंड तिसरा टी२०: टीम इंडियात मोठे बदल; रवी बिश्नोई बाहेर, तर वैभव सूर्यवंशीवर सर्वांचे लक्ष!
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- तेलंगणा: प्रियकरासाठी पत्नीने नर्स असूनही सलाईनमध्ये टॉयलेट क्लीनर टाकून नवऱ्याचा केला गेम



























Subscribe to my channel

