
Pune : पुण्यातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस जटिल होत चालली आहे. वाहतूककोंडीतून मार्ग काढणाऱ्या पुणेकरांना अक्षरश: जीव मुठीत धरून जावे लागते. कोंडीमुळे होणारे वादावादीचे प्रसंग नित्याचे झाले आहेत. कारवाई करणाऱ्या पोलिसांवर हल्ले होणे, शिवीगाळ करण्याचे प्रकारही घडतात. बेशिस्त वाहनचालक, चौकाचौकांतील अतिक्रमणामुळे कोंडीत भर पडते. शहरातील वाहनांची संख्या वाढत असून, वाहतूक नियोजनाची जबाबदारी फक्त ९०० पोलीस कर्मचाऱ्यांवर आहे. त्यामुळे पुण्यातील वाहतूककोंडी सुटणार कशी, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
पुणे शहराचा विस्तार वाढत आहे. मुंबईच्या तुलनेत पुण्याचा विस्तार मोठा आहे. शहर आणि जिल्ह्याची लोकसंख्या एक कोटीच्या पुढे आहे. रोजगार, तसेच शिक्षणासाठी शहरात वेगवेगळ्या भागांतील नागरिक स्थायिक होण्याचे प्रमाण वाढत आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नोंदीनुसार शहरात ३९ लाख वाहने आहेत. त्यात दुचाकींचे प्रमाण मोठे आहे. दुचाकींच्या खालोखाल मोटारींची संख्या जास्त असून, वाहन खरेदीचे प्रमाण वाढत आहे. शहराचा वाढता विस्तार, महत्त्वाच्या रस्त्यांवर होणारी कोंडी विचारात घेऊन पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील सर्व वाहतूक विभागांची नव्याने पुनर्रचना करण्याचा निर्णय नुकताच घेतला. शहरातील महत्त्वाचे रस्ते, रहदारी विचारात घेऊन वाहतूक विभागांची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे शहरात २८ वाहतूक विभाग आहेत. पोलीस ठाण्यांप्रमाणे वाहतूक विभागाचे कामकाज चालते. वाहतूक विभागातील रस्ते आणि भागांचा विचार करून वाहतूक विभागाची पुनर्रचना करण्यात आली असून, नवीन रचनेनुसार वाहतूक विभागाचे १८ विभागांत कामकाज चालणार आहे.
|
Mumbai : महापालिकेच्या बोनमॅरो प्रत्यारोपण केंद्रात ३७० बालकांचे बोनमॅरो प्रत्यारोपण! |
वाहतूककोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांनी ‘मिशन ३२’ ही माेहीम हाती घेतली आहे. त्यासाठी शहरातील ३२ प्रमुख रस्त्यांची निवड करण्यात आली आहे. शहरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी पुणे पोलिसांकडून सर्वसमावेशक सल्लागार समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रमुख रस्त्यांवर वाहतूककोंडी झाली, की शहरातील वाहतूक विस्कळीत होते. त्यामुळे या रस्त्यांवर वाहन लावण्याची व्यवस्था वाहतूक नियंत्रण, चौक सुधारणा अशी विविध कामे केली जाणार आहेत. वाहतूक पोलीस महापालिकेशी समन्वय साधून वाहतूक सुधारणाविषयक कामे करणार आहेत. समितीत लोकप्रतिनिधी, निवृत्त पोलीस अधिकारी, वाहतूक तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ पत्रकार, तसेच खासगी सल्लागार यांचा समावेश असणार आहे. समितीतील सदस्यांचा अनुभव आणि सूचना विचारात घेऊन पोलीस वाहतूककोंडी सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहेत.
एक ऑगस्टपासून ‘मिशन ३२’ या माेहिमेचा प्रारंभ, तसेच वाहतूक विभागाची पुनर्रचनाही करण्यात आली. मात्र, पुनर्रचना आणि मोहीम राबवून शहरातील वाहतूक समस्या आणि कोंडी सुटणार का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. शहराचा वाढता विस्तार विचारात घेतल्यास वाहतुकीच्या नियोजनाची जबाबदारी वाहतूक शाखेतील ९०० कर्मचाऱ्यांवर आहे. ९०० कर्मचाऱ्यांच्या बळावर संपूर्ण शहरातील वाहतुकीचे नियोजन करणे तसे अशक्य आहे. शहर, तसेच उपनगरातील प्रमुख चौकांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे वाहतूककोंडी, तसेच नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईपुरते ठीक आहेत. मात्र, कोंडी सोडविण्यासाठी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरूनच काम करावे लागणार आहे, याचादेखील विसर पडता कामा नये. जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे शहरातील वाहतूक समस्या सुटणार नाही. त्यासाठी सर्वंकष प्रयत्न करावे लागणार आहेत. चौकाचौकांत झालेल्या अतिक्रमणावर कारवाई करावी लागणार आहे.
महापालिका, पुणे महानगर विकास प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, रस्तेविकास महामंडळ अशा यंत्रणांशी समन्वय साधून पुण्यातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागणार आहे. पुण्यातील वाहतूक समस्या एखादी योजना राबवूनही सुटेल, याची हमी देणे योग्य ठरणार नाही. आजमितीला अनेकजण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्यापेक्षा खासगी वाहनांचा वापर करण्यास प्राधान्य देत आहेत. मेट्रो, पीएमपी सेवेकडे अधिकाधिक नागरिक कसे वळतील याचाही विचार करणे गरजेचे आहे.
रस्त्यावर प्रत्यक्ष उभे राहून वाहतूक नियंत्रण करणे तितके सोपे नाही. बेशिस्त वाहनचालकांचे चौकाचौकांत पोलिसांशी वाद होतात. कारवाई केल्यानंतर प्रकरण हमरीतुमरीवर जाते. वाहतूक पोलिसांना शिवीगाळ केली जाते. पोलिसांकडून अरेरावी केली जात असल्याच्या तक्रारी होतात. वाहनचालकांमध्येही आपसात वाद होतात. त्याचे पर्यवसान हाणामारीत होते. एकंदरच पुण्यात वाहन चालविणे अवघड बनले आहे. कधी काय घडेल, याचा नेम नाही. अरुंद रस्त्यांवरील कोंडी, वाद असे प्रसंग वाहनचालकांना रोजच अनुभवायला मिळतात. वाहतूक नियंत्रण करणाऱ्या पोलिसांना पाठबळ देणे गरजेचे आहे. वाहतूक शाखेतील मनुष्यबळ वाढविण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना गृह विभागाकडे पाठपुरावा करावा लागणार आहे. मनुष्यबळ वाढविण्याबरोबरच रस्त्यावर उभे राहून काम करणाऱ्या वाहतूक पोलिसांच्या मागे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ठामपणे उभे राहणे गरजेचे आहे. वाहतूक पोलिसांचे मनोधैर्य वाढविल्यास काही अंशी शहरातील वाहतूक समस्या सुटण्यास मदत होईल. नाहीतर योजना, मोहिमा कागदावरच राहतील…
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ

























Subscribe to my channel




