
Pune : गेली दोन तीन वर्ष केंद्र सरकार महानगर पालिकेच्या निवडणुका घेत नाहीये. इथे नगरसेवक नाही. नगरसेवक नसल्याने जबाबदारी घेणार कोण, प्रशासनाशी बोलायचे कुणी? असे सवाल उपस्थित करून खडकवासला धरणातून किती पाणी सोडण्याचे नियोजन आहे? लोकांना त्या पाण्याचा धोका आहे का? हे सांगण्याचे सरकारचे काम नाही काय? अशा पद्धतीने कामे होत असतील तर याला काय सरकार चालविणे म्हणतात काय? अशा शब्दात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुण्यात आलेल्या पुरावरुन राज्य सरकारची खरडपट्टी काढली.
शहर वेडेवाकडे वाढले असून, योग्य नगर नियोजन नसल्याने पूरपरिस्थिती ओढवते आहे. हा संपूर्णपणे संबंधित सरकारी खात्यांचा निष्काळजीपणा असून, नागरिकांचे झालेले नुकसान सरकारने भरून दिले पाहिजे, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली. राज ठाकरे यांनी पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधला. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना शासन प्रशासनावर त्यांनी कठोर शब्दांत टीका केली.
|
Mumbai : मुंबईची पाणीकपात आजपासून मागे; धरणांमध्ये ७३ टक्के साठा; पाणीपुरवठा पूर्ववत |
मुंबई बकाल व्हायला वेळ लागला, पुणे बकाल व्हायला वेळ लागणार नाही
‘राज्य सरकार, प्रशासन व पुणे महापालिकेच्या चुकांमुळे पूर आला असून शहराचा विकास आराखडा तयार होतो परंतु नगर नियोजन (टाउन प्लॅनिंग) केले जात नाही. जमीन दिसली की विकण्याचा प्रकार सध्या जिकडे तिकडे सुरू आहे. मुंबईत ज्यावेळी लोखंडवाला कॉम्पेक्स झाले त्यावेळी आम्हाला वाटलं वेगळी मुंबई झाली पण पुणे कुठपर्यंत पसरतंय, याचा अंदाज लागत नाहीये. नगरपालिकेमधले अधिकारी आणि राज्य सरकारमधील नेते यांचे नेक्सस आहे. मुंबई बकाल व्हायला वेळ लागला, पुणे बकाल व्हायला वेळ लागणार नाही’ असे राज ठाकरे म्हणाले.
याला काय सरकार चालविणे म्हणतात काय...?
गेली दोन तीन वर्ष केंद्र सरकार महानगरपालिकेच्या निवडणुका घेत नाहीये. इथे नगरसेवक नाही. नगरसेवक नसल्याने जबाबदारी घेणार कोण, प्रशासनाशी बोलयचे कुणी? हा प्रश्न आहे. महानगर पालिकांत प्रशासकीय कारभार चालू असताना, ही सगळी जबाबदारी त्यांनीत घेतली पाहिजे, असे सांगतानाच पुण्यात पूर आलेल्या काही ठिकाणी पुनर्विकासाचा प्रश्न आहे, असे सांगितले जात आहे. त्या लोकांशी शासनाने बोलायला हवे. बाहेरच्या राज्यातील लोक येऊन घरे मिळवतात, पण इथल्या लोकांचा घरांसाठीचा संघर्ष सुरू आहे. याला काय सरकार चालविणे म्हणतात का? असा संताप व्यक्त करत राज्य शासनाच्या कामावर राज यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




