
Drought in Maharashtra : राज्य सरकराने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने राज्यात यंदा पाऊस सरासरीपेक्षा कमी पडल्याने १५ जिल्ह्यातील २४ तालुक्यांमध्ये गंभीर दुष्काळ शासनाने जाहीर केला आहे. त्याचबरोबर सरकारकडून १६ तालुक्यांमध्ये मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने राज्यातील ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. राज्य सरकारने गंभीर दुष्काळ आणि मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केल्याने काही सवलतीही जाहीर केल्या आहेत.
राज्य सरकारच्या निर्णयानुसार, जमीन महसूल सूट, पीक कर्जाचे पुर्नगठन, शेतीशी निगडीत कर्जाची वसूली स्थगित, शालेय व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता असणार आहे.
|
Pune News : मराठा आरक्षणासाठी नवले पुलावर जाळपोळ; पोलिसांकडून ४०० ते ५०० जणांविरोधात गुन्हे दाखल |
तसेच या तालुक्यात आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकरचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे, अशा स्वरुपाच्या सवलती राज्य सरकारने जाहीर केल्या आहेत
राज्य सरकारच्या निर्णयानुसार, जालना, छ.संभाजीनगर, पुणे, नाशिक, बीड, लातूर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. सरकारने एकूण ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे.
राज्य सरकारच्या निर्णयावर विरोधीपक्ष नेते वडेट्टीवर यांची प्रतिक्रिया
राज्य सरकारने जाहीर केलेल्या निर्णयाचा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विरोध केला आहे. ' सरकारने ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा. सरकारने पुन्हा वस्तुस्थितीचा आढावा घेऊन कर्नाटकच्या धर्तीवर राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करावा, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
'सरकारने राज्यातील फक्त चाळीस तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले आहेत. परंतु संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत, अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली आहे.
'राज्यात निम्म्या जिल्ह्यात ५०% पेक्षा कमी पाऊस पडला. सोयाबीन पीक नष्ट झाले, रोगाने पिकाचे नुकसान झाले, अनेक ठिकाणी पिण्याचे पाणी नाही, असे असताना फक्त चाळीस तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले आहेत. शेतकरी हा सरकारच्या लेखी दिसत नाही. शेतकऱ्यांना मागच्या वर्षीच्या अनुदान मिळाले नाही. शेतकऱ्यांना खड्ड्यात घालण्याचे काम सरकार करत आहे, असंही टीकास्त्र वडेट्टीवार यांनी केली.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




