औरंगाबाद : महापालिकेने भूमिगत गटार योजनेअंतर्गत कोट्यवधी रुपये खर्च करून एसटीपी प्लांट (सिवरेज ट्रिटमेंट प्लांट) सुरू केले आहेत. या केंद्रातून बाहेर पडणाऱ्या प्रक्रियायुक्त पाण्याचा वापर व्हावा, यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. मात्र दररोज किमान ७० एमएलडी पाणी वाया जात आहे. या पाण्याचा वापर करण्यासाठी आता महापालिकेनेच पुढाकार घेतला आहे. पडेगाव येथील एसटीपीचे पाणी सफारी पार्कसाठी तर कांचनवाडी येथील एसटीपीचे पाणी पाईपव्दारे शहरात आणून बांधकामांसह इतर कामांसाठी उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी बुधवारी (ता. १६) सांगितले.
महापालिकेने ड्रेनेजच्या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी कांचनवाडी, पडेगाव व झाल्डा फाटा येथे एसटीपी प्लांट सुरू केले आहेत. यातील सर्वाधिक मोठा प्लांट १६१ एमलडीचा कांचनवाडी येथील आहे. तसेच झाल्टा फाटा येथील ३५ तर पडेगाव येथील प्रकल्प १० एमएलडी क्षमतेचा आहे. सध्या कांचनवाडी येथे ६० ते ७०, झाल्डा फाटा येथे सहा ते सात तर पडेगाव येथे दोन एमएलडी पाण्यावर प्रक्रिया केली जात आहे.
मात्र या पाण्याचा वापर होत नाही. हे पाणी सर्रास नदीपात्रात सोडले जात आहे. दरम्यान प्रक्रियायुक्त पाणी एमआयडीसी, डीएमआयसी, बांधकाम व्यावासायिक, वीटभट्टी चालकांनी वापरावे यासाठी महापालिकेने प्रयत्न केले. पण समृद्धी महामार्ग वगळता इतरांनी प्रतिसाद दिला नाही. आता महापालिकेनेच या पाण्याचा वापर करण्या निर्णय घेतला आहे. यासंदर्भात प्रशासक श्री. पांडेय यांनी सांगितले की, पडेगाव येथील प्लांट सफारी पार्कच्या जवळ आहे. त्यामुळे येथील पाण्याचा वापर सफारीपार्कसाठी केला जाणार आहे. त्यासंदर्भात उपाय-योजना करण्याची जबाबदारी नगर रचना विभागाचे उपसंचालक ए. बी. देशमुख यांच्याकडे सोपविण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
शहरात उपलब्ध करून देणार प्रक्रियायुक्त पाणी
नागरिकांना सध्या पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे तर दुसरीकडे कांचनवाडी येथील एसटीपी प्रकल्पातून ५० ते ६० एमएलडी पाणी दररोज वाया जाते. अनेक नागरिक नळाच्या पाण्याचा वापर बांधकामासाठी, बागकाम, गाड्या धुण्यासाठी व इतर कारणासाठी करतात. त्यांना एसटीपीचे प्रक्रियायुक्त पाणी मिळाले तर नळाच्या पाण्याची बचत होईल. त्यामुळे कांचनवाडी येथील प्रकल्पातून पाइपलाइन करून हे पाणी शहरातील काही पॉइंटवर उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव तयार केला जात असल्याचे श्री. पांडेय यांनी सांगितले.हे पण वाचा-
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




