
Mumbai News: बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या सर्वेक्षणावरुन सुरु असलेल्या वादावर राज्याजे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. 'बारसूची जमीन उद्धव ठाकरेंनीच सुचवली होती. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना यासंदर्भात 2020 मध्ये पत्र पाठवले होते.', असा दावा त्यांनी केला आहे. या पत्रकार परिषदेत त्यांनी माध्यमांना उद्धव ठाकरेंचे ते पत्र देखील दाखवले.
उदय सामंतांनी पत्रकार परिषद घेत बारसू प्रकल्पासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी 2020 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवलेल्या पत्राचा दाखला दिला. यावेळी त्यांनी असे सांगितले की, 'रिफायनरीसाठी बारसूची जमीन उद्धव ठाकरे यांनीच सुचवली होती. या संदर्भात त्यांनी 12 जानेवारी 2020 ला पंतप्रधानांना पत्र लिहिले होते. बारसूमध्ये 1300 एकर जमीन रिफायनरीसाठी देऊ शकतो असे त्यांनी पत्रात लिहिले होते.' बारसूवरुन राजकारण करणाऱ्यांना या पत्राचा दाखला देत उदय सामंत यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
'एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असल्यामुळे उद्धव ठाकरे यांचा बारसू प्रकल्पाला विरोध आहे. एकनाथ शिंदेंऐवजी तेच मुख्यमंत्री असते तर प्रकल्प पुढे गेला असता.', असा टोला त्यांनी यावेळी लगावला आहे. 'शिवसेना भवनावर एक पत्रकार परिषद झाली होती. त्यात रिफायनरी आम्ही आणली त्याचे श्रेय सरकारने घेऊ नये असे म्हटले होते. आता यात राजकारण का?', असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला आहे.
उदय सामंत यांनी पुढे सांगितले की, 'रिफायनरीच्या कामामध्ये राजकारण केले जात आहे. पण हे राजकारण करण्याची गरज नाही. समृद्धी महामार्गाच्या बाबतीत देखील तेच होत होते. मतांचं घाणेरडं राजकारण करु नका. एकीकडे प्रकल्पाला विरोध करायचा दुसरीकडे प्रकल्प बाहेर गेले म्हणून खापर आमच्यावर फोडायचे. हे सगळं नौटंकी आहे.', असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




