
Raigad : राज्यभर तिथीनुसार (6 मार्च) छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. मात्र शिवरायांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महाराजांच्या समाधी परिसरात सुरक्षेसाठी उभारण्यात आलेले लाकडी बॅरिकेट तुटलेले असून ते दुरुस्त करण्याऐवजी चक्क कापडी चिंध्यांनी बांधून ठेवण्यात आल्याचे उघड झाल्याने शिवभक्त आणि पर्यटकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
समाधी परिसरातील बॅरिकेटची दुरवस्था
मिळालेल्या माहितीनुसार, किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी परिसरात भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने लाकडी बॅरिकेट उभारण्यात आले आहेत. मात्र यापैकी काही बॅरिकेट तुटले असून त्याची योग्य दुरुस्ती करण्यात आलेली नाही. तुटलेल्या भागाला तात्पुरत्या स्वरूपात कापडी चिंध्यांनी बांधण्यात आल्याचे चित्र शिवजयंतीच्या दिवशीच समोर आले. त्यामुळे शिवभक्तांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे.
शिवजयंतीला भाविकांची मोठी गर्दी
दरम्यान, शिवजयंतीनिमित्त हजारो भाविक, शिवप्रेमी आणि पर्यटक रायगडावर दाखल झाले होते. अशा वेळी महाराजांच्या समाधीस्थळाजवळील बॅरिकेटची ही अवस्था पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त करत प्रशासनावर टीका केली. शिवरायांच्या राजधानीतच असा निष्काळजीपणाचा प्रकार घडत असल्याने राज्यकर्ते आणि संबंधित यंत्रणा ऐतिहासिक वारशाबाबत किती गंभीर आहेत, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
विकासकामांवरून यापूर्वीही टीका
किल्ले रायगडावरील विकासकामांबाबत यापूर्वीही अनेकदा निकृष्ट दर्जा आणि नियोजनाच्या अभावाबाबत तक्रारी समोर आल्या आहेत. पुरातत्त्व विभाग आणि रायगड प्राधिकरणामार्फत करण्यात आलेल्या कामांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे आरोपही झाले होते. अशा पार्श्वभूमीवर समाधी परिसरातील बॅरिकेट तुटलेले असताना ते चिंध्यांनी बांधण्याचा प्रकार समोर आल्याने पुन्हा एकदा प्रशासनाच्या दुर्लक्षाचा मुद्दा चर्चेत आला आहे.
नेमकी जबाबदारी कुणाची?
हे बॅरिकेट नेमके पुरातत्त्व विभागाने की रायगड प्राधिकरणाने अशा पद्धतीने दुरुस्त केले, याबाबत मात्र अधिकृतरीत्या कोणीही स्पष्ट बोलण्यास तयार नसल्याचे समोर आले आहे. मात्र शिवजयंतीच्या दिवशीच घडलेल्या या प्रकारामुळे रायगडावर आलेल्या शिवभक्तांनी आणि पर्यटकांनी जाहीर नाराजी व्यक्त करत प्रशासनाचा निषेध नोंदवला आहे.
वारशाच्या जतनाबाबत प्रश्नचिन्ह
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आणि महाराष्ट्राच्या इतिहासातील अत्यंत पवित्र स्थळ असलेल्या रायगड किल्ल्यावर अशा प्रकारची परिस्थिती दिसून येत असल्याने ऐतिहासिक वारशाच्या जतनाबाबत प्रशासनाने अधिक जबाबदारीने काम करण्याची गरज असल्याचे मत शिवप्रेमींनी व्यक्त केले आहे.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel




Promote our products—get paid for every sale you generate!