
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतीदिन असून यानिमित्ताने पुन्हा एकदा ठाकरे आणि शिंदे गट-भाजपा आमने-सामने आहेत. स्मृतीदिनाच्या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी एक मोठी मागणी केली असून हे स्मृतीस्थळ सरकारने ताब्यात घेतलं पाहिजे असा सल्ला दिला आहे. दरम्यान त्यांच्या या मागणीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे.
“वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच स्मारक कोणत्याही एका कुटुंबाचं होऊ शकत नाही. महाराष्ट्रासाठी गौरव असलेलं हे स्मारक महाराष्ट्र शासनाने आपल्या ताब्यात घेतलं पाहिजे, अशी मी सरकारकडे मागणी करत आहे,” असं प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे. तसंच देखभालीसाठी समिती स्थापून त्यात ठाकरे कुटुंबातल्या एखाद्या सदस्याची नेमणूक करावी, असा सल्लाही त्यांनीही दिला आहे.
“हे स्मारक कोणाचीही खासगी संपत्ती नाही. ते कोणत्याही एका कुटुंबाचं नाही. ते राज्य सरकारचं स्मारक आहे. ती जमीन, त्यासाठी लागणारा निधी सरकारचा आहे. हे स्मारक राज्य सरकारने ताब्यात घेतलं पाहिजे. सन्मान म्हणून ठाकरे कुटुंबीयांपैकी एक किंवा दोन सदस्यांना या स्मारक समितीवर घ्यावं,” अशी मागणी त्यांनी केली असून यासंबंधी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचं म्हटलं आहे.
“खंजीर कोणी कोणाच्या पाठीत खुपसला हे सर्वांना माहिती आहे. संजय राऊतांनी सर्वात प्रथम उद्धव ठाकरेंना आपलं खंजीर लपवून ठेवण्यास सांगावं. उद्धव ठाकरेंनीच खंजीर खुपसण्याचं काम केलं आहे. एकनाथ शिंदे मर्दासारखे लढले आहेत. हिंदुत्व सोडणाऱ्या गद्दारांना त्यांनी आपली जागा दाखवून दिली,” असं प्रत्युत्तरही त्यांनी संजय राऊतांना दिलं.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बुधवारी स्मारकाचा आढावा घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी प्रसाद लाड यांच्या मागणीवर ते म्हणाले की “पक्षाची अशी कोणतीही मागणी नाही. वैयक्तिकदृष्ट्या कोणालाही असं वाटत असेल तर ते शक्य आहे. पण भाजपाने अशी कोणतीही मागणी केलेली नाही. बाळासाहेबांचं स्मारक जनतेचं असून, त्यांचंच राहणार आहे”.
“खासगी बैठकांसाठी या स्मारकाचा वापर होऊ नये अशी सर्वांचीच आशा आहे. एखादं राष्ट्रीय स्मारक उभं राहिल्यानंतर काही नियम असतात, त्यांचं पालन होईल अशी अपेक्षा आहे,” असंही यावेळी ते म्हणाले.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




