
कराड : उसाला प्रतिटन साडेतीन हजार रुपयांप्रमाणे पहिली उचल देण्याची सुबुद्धी साखर कारखानदारांना द्यावी असे साकडे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीवर शेतकरी संघटनांच्यावतीने नतमस्तक होऊन घालण्यात आले.कोपर्डे हवेली येथील सिद्धनाथाचे दर्शन घेऊन उसदरासाठी निघालेली टाळ-मृदुंगाच्या गजरातील पायी दिंडी कराडच्या प्रीतिसंगमावर विसावली. येथील माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीवर उस आणि फुले वाहून शेतकरी व सामाजिक संघटनांच्या नेत्यांनी व शेतकऱ्यांनी ‘उसाला साडेतीन हजाराच्या पहिल्या देयकासाठी सातारा जिल्ह्यातील साखर कारखानदारांना सुबुद्धी द्या’ असे साकडे घातले.
उसदर संघर्ष समितीच्या पुढाकाराने निघालेल्या या सहा किलोमीटरच्या पायी दिंडीत रयत क्रांती संघटनेचे प्रमुख माजी मंत्री सदाभाऊ खोत, पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सचिन नलवडे, बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पंजाबराव पाटील, जिल्हाध्यक्ष विश्वास जाधव, बैलगाडा शर्यत संघटनेचे नेते धनाजी शिंदे, प्रहार संघटनेचे अमोल कारंडे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ‘उसदर आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा’, ‘शेतकरी एकजुटीचा विजय असो’ अशा घोषणांनी प्रीतिसंगम उद्यान परिसर दणाणून गेले होते.
सदाभाऊ खोत या वेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले की, राज्याचे पहिले मुख्यमंत्री व उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्रात सहकार आणि साखर कारखानदारी उभी केली. आज मात्र चव्हाणसाहेबांचे नाव घेऊन सत्तेच्या खुर्चीवर बसलेल्या लोकांना त्यांच्या मूळ विचाराचा विसर पडलाय. शेजारच्या कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाने उसाला जो दर देत आहेत. तेवढाच साखर उतारा असताना साताऱ्यातील कारखानदार कोल्हापूरप्रमाणे उसदर का देत नाही हा आमचा प्रश्न आहे.
राज्यकर्त्यांनी दोन साखर कारखान्यामधील अंतराची अट काढून टाकावी आणि खुली स्पर्धा निर्माण करावी. सर्व उद्योग खुले असतील, त्यावर असे बंधने नसतीलतर ती साखर कारखान्यांबाबतीत का असा सवाल करून, आमच्या बापाच्या शेतात जे पिकतंय त्यावर तुम्ही बंधन लावताय आणि त्यातील संबंधित साखर कारखानदाराला मोकळे रान करून देताय हे अतिशय चुकीचे असल्याची खंत सदाभाऊंनी व्यक्त केली. शरद जोशी यांनी झोनबंदीची लढाई सन १९८४ ला सुरु केली आणि १९९६ ला ही बंदी अखेर उठली. त्याप्रमाणेच शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढत राहू. पण, आमच्या मागण्या मान्य केल्याखेरीज स्वस्थ बसणार नसल्याचा इशारा खोत यांनी दिला.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




