
पुणे : नातेसंबंध, कामाच्या ठिकाणी असलेली जीवघेणी स्पर्धा, समाज माध्यमे आणि वैयक्तिक आणि व्यावयासिक आयुष्यात समतोल राखताना होणारी ओढाताण या प्रमुख कारणांमुळे भारतातील तरुण पिढी ताणतणावांचा सामना करत असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. देशातील शहरी भागात राहणाऱ्या सुमारे ८१ टक्के तरुण पिढीला या तणावाचा सामना करावा लागत आहे.
मानसिक आरोग्या दिनानिमित्त ‘आयटीसी फिआमा’ तर्फे भारतातील तरुणाई आणि तिच्यासमोरील मानसिक आरोग्याचे प्रश्न यांबाबत हे सर्वेक्षण घेण्यात आले. करिअर, नातेसंबंध आणि समाज माध्यमे ही तरुणाईच्या मानसिक स्थैर्याला आव्हान देणारी सर्वांत प्रमुख कारणे असल्याचे या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. त्याचवेळी अवघ्या ३३ टक्के तरुणांनाच ताणतणाव निवारणासाठी व्यावसायिक मदत घ्यावीशी वाटत असल्याचेही या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.
नकारात्मकतेचा परिणाम आपल्या कार्यक्षमतेवर होत असल्याचे एक महत्त्वाचे निरीक्षणही या सर्वेक्षणात सहभागी होणाऱ्या तरुण पिढीकडून नोंदवण्यात येत आहे. पुरुषांच्या तुलनेत कामाचा ताण स्त्रियांना अधिक जाणवतो. ७१ टक्के स्त्रियांच्या मते यशाच्या समाजमान्य व्याख्येत स्वत:ला बसवताना त्यांची दमछाक होते. ८७ टक्के तरुण पिढीला नातेसंबंध, जोडीदाराशी नाते संपणे किंवा नात्यांतील दुरावा या गोष्टींचा ताण येतो. या वयोगटातील दर तीनपैकी एका व्यक्तीच्या मते नातेसंबंधांचा त्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर प्रचंड परिणाम होतो. तरुण पिढी ताण कमी करण्यासाठी काही पर्यायांचाही विचार करतात, जसे की मन शांत करण्यासाठी ४३ टक्के संगीताकडे वळतात. योग, ध्यानधारणा तसेच आपल्या प्रियजनांसोबत वेळ घालवणे हा ताणतणावापासून स्वत:ला दूर ठेवण्यासाठीचा पर्याय असल्याचे या तरुण पिढीकडून नमूद करण्यात येत आहे.
ताणतणाव कशामुळे?
- नातेसंबंध, त्यातील फोलपणा किंवा तात्पुरतेपणा
- कामाच्या ठिकाणी असलेली जीवघेणी स्पर्धा
- वैयक्तिक आणि व्यावसायिक जगण्याचा समतोल राखताना होणारी ओढाताण
- यशाच्या समाजमान्य व्याख्या आणि त्या व्याख्येत स्वत:ला बसवताना होणारी दमछाक.
—-चौकट—
उपाय काय?
- ३३ टक्क्यांहून कमी तरुणांची तज्ज्ञांकडून मदत घेण्यास पसंती
- संगीत ऐकणे, योग, ध्यानधारणा, व्यायाम यामध्ये मन रमवण्यास प्राधान्य
- समाज माध्यमांच्या वापरात खंड पाडणे किंवा डिजिटल डिटॉक्स करणे
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




