राम मोहन नायडूंनी राजीमाना द्यावा; पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

केंद्रीय विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. अजित पवारांच्या अपघाताबाबत केंद्रीय पातळीवर चर्चा झाली असून, काँग्रेस कार्यकारणी यावर अंतिम भूमिका घेईल, असेही चव्हाण यांनी नमूद केले.

राज्यात अनेक महत्त्वाच्या घडामोडी समोर आल्या आहेत. बदलापुरातील अंडाशय तस्करी प्रकरणामध्ये मंत्री प्रकाश आबिटकर यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. गरीब महिलांना आमिष दाखवून ही तस्करी करणाऱ्या तीन महिलांना अटक करण्यात आली आहे. दोन-तीन दिवसांत या प्रकरणी प्राथमिक अहवाल येईल असे त्यांनी सांगितले.

नाशिकमध्ये राज्य रोजंदारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या प्रयत्नांमुळे स्थगित झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत या आंदोलनावर तोडगा काढण्यात आला. दुसरीकडे, भंडाऱ्यातून बाळ विक्रीचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. गोंदियातील डॉक्टर नितेश वाजपेयी यांनी मोहदुरा येथील दाम्पत्याला सुमारे चार लाख सत्तर हजार रुपयांना बाळ विकल्याची माहिती उघड झाली आहे. महिला व बाल विकास अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने बाळ ताब्यात घेतले आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *