भारत पाकिस्तान सामन्याने टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीचा विक्रम मोडला, नेमकं कारण काय?Image Credit source: Icc X account
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात राजकीय दुरावा निर्माण झाला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचे सर्व संबंध मोडले आहेत. तसेच पाकिस्तानला प्रत्येक पातळीवर धडा शिकवण्याचा निश्चय दिसत आहे. त्याची प्रचिती क्रिकेटच्या मैदानातही दिसून आली आहे. भारतीय संघाने पाकिस्तानात खेळण्यास स्पष्ट नकार दिला. चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताचे सर्व सामने दुबईत झाले. त्यानंतर आशिया कप स्पर्धेत नो हँडशेक पॉलिसी कायम ठेवली. हाच कित्ता टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत कायम आहे. असं असताना दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने येणार म्हंटलं उत्साह शिगेला पोहोचणार यात काही शंका नाही. पण या स्पर्धेपूर्वी पाकिस्तानने भारताविरूद्ध खेळणार नाही असा पवित्रा घेतला आहे. बांगलादेशवर अन्याय झाल्याचं कारण पुढे करत मोठा गाजावाजा केला होता. पण अखेर झुकले आणि भारताविरुद्ध सामना खेळले. आयसीसीच्या प्रयत्न यशस्वी ठरले आणि या सामन्याला मोठा प्रेक्षकवर्गही लाभला.
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेची अधिकृत डिजिटल आणि प्रसारण भागीदारी जिओस्टारकडे आहे. भारत पाकिस्तान सामन्याच्या पाच दिवसानंतर त्यांनी प्रेक्षकसंख्येची आकडेवारी जाहीर केली आहे. 15 फेब्रुवारीला पार पडलेल्या भारत पाकिस्तान सामन्याला डिजिटल आणि ऑनलाइन स्ट्रिमिंगद्वारे 16.3 कोटी प्रेक्षकसंख्या लाभली आहे. इतक्या लोकांनी हा सामना डिजिटल माध्यमातून पाहिल्याची नोंद झाली आहे. यात टीव्हीवर सामना पाहणाऱ्यांची संख्या नाही. त्यात ही संख्या जोडली गेली तर आकडा अजून फुगेल यात काही शंका नाही. आयसीसी टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात यापूर्वी कधीही इतकी प्रेक्षकसंख्या लाभली नाही.
टी20 वर्ल्डकप अंतिम फेरीपेक्षा जास्त प्रेक्षकसंख्या डिजिटल माधम्यातून लाभल्याचं कंपनीने आकडेवारी जाहीर करताना सांगितलं. टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेत भारत पाकिस्तान हे संघ आमनेसामने आले होते. पण त्यापेक्षाही जास्त प्रेक्षकवर्ग आता लाभला. त्या सामन्याच्या तुलनेत 56 टक्के अधिक डिजिटल व्ह्यूज मिळाले.
पाकिस्तानच्या भूमिकेमुळे असं झालं का?
भारत पाकिस्तान सामना रद्द होणार अशीच स्थिती आधी होती. मात्र त्यानंतर आयसीसीने यशस्वी मध्यस्थी केली आणि सामना पार पडला. त्यानंतर लाभलेली डिजिटल प्रेक्षकवर्गाची संख्या पाहता नेमकं काय कारण असू शकतं? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पारंपरिक प्रतिस्पर्धी संघ की पाकिस्तानचं बहिष्कार अस्त्र कामी आलं हे सांगणं कठीण आहे. वाढलेली संख्या ही पाकिस्तानच्या नाटकांमुळे झाली असावी असा अंदाज आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




