पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?

राजा आणि साधू यांच्यातील वादाचे अनेक प्रसंग शास्त्रात आले आहेत. जो सांसारिक दृष्टीने यशस्वी आहे तो राजा आणि जो स्वतःच्या नजरेत समाधानी आहे तो साधू. आपल्याकडे तीन लोकांना 'महाराज' म्हटले जाते - साधू, राजा आणि स्वयंपाकी. हे तिघेही जीवनात अत्यंत महत्त्वाचे आहेत. जग जेव्हा साधू आणि राजाला एकमेकांत अडकलेले पाहते, तेव्हा ते चिंतेत पडते. साधू आणि राजा जेव्हा कधी वाद करतील, तेव्हा साधूचा वर्तमान बिघडेल आणि राजाचे भविष्य. एक कथा अशी येते की, वशिष्ठांचा पुत्र शक्ती एकदा पूल ओलांडत होता आणि तिथूनच राजा कलमाशपाद येत होते. पूल अरुंद होता. त्यावरून एकच जण जाऊ शकत होता, त्यामुळे मागे कोण हटणार यावरून दोघांत वाद झाला. राजाला पदाचा अहंकार होता, तर साधूला तपाचा. साधूने राजाला राक्षस होण्याचा शाप दिला. राजा राक्षस झाला व त्याने साधूलाच खाऊन टाकले. दोघेही संपले. ही कथा हेच सांगते की, आपापल्या मार्गाने नीट चालावे, कुणाचा रस्ता उगीच अडवू नये साधूचा आपला मार्ग आहे व राजाचा आपला राजपथ.


विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *