एआयच्या मदतीने काम पूर्ण करणाऱ्या लोकांना विचारा की, ते याद्वारे किती वेळ वाचवतात? 'एआयने आमचे काम सोपे नाही तर अधिक कठीण केले आहे,' असे म्हणून ते तुम्हाला चकित करू शकतात. केवळ कर्मचाऱ्यांचीच नाही, तर एआयच्या सर्वात मोठ्या समर्थकांचीही हीच अपेक्षा होती की, यामुळे कामाचा भार कमी होईल आणि लोकांना उच्चस्तरीय सर्जनशील कामांसाठी अधिक वेळ मिळेल. बिल गेट्स आणि जेपी मॉर्गन चेसचे जेमी डायमन यांसारख्या तंत्रज्ञान आणि व्यवसाय क्षेत्रातील दिग्गजांनीही म्हटले होते की, 'एआयमुळे अखेर लोकांना जास्त नाही तर कमी काम करावे लागेल आणि कामाचे दिवस कमी होऊ शकतात.' इलॉन मस्क यांनी तर म्हटले होते की, पुढील दोन दशकांत एआय आणि रोबोट्सच्या प्रगतीमुळे काम करणे हे ऐच्छिक ठरू शकते. परंतु, सध्या तरी सर्व काही याच्या उलट घडत असल्याचे संशोधनातून दिसून येत आहे. असे का घडत आहे? असे नाही की एआय कार्यक्षमता वाढवत नाही. खरे तर एआय जी क्षमता किंवा वेळ वाचवते, त्याचा वापर लगेच दुसऱ्या कामात केला जातो. यामुळेच कामाचा ताण वाढू लागतो. उदाहरणार्थ, जर कुणी एआयच्या मदतीने एखादा प्रकल्प करत असेल, तर प्राथमिक अहवाल काही सेकंदांत तयार होतो. पण त्याचसोबत एआय असेही सुचवते की, 'मी या गोष्टीचाही विचार करू का?' किंवा 'तुमच्या कंपनीच्या गरजेनुसार मी अंमलबजावणीची योजना जोडू शकतो' किंवा 'तुमच्या ग्राहकांची यादी मला माहीत असल्याने मी त्यांच्या आवडीनुसार यात बदल करू शकतो.' अशा प्रकारे एआय एकावर एक 7-8 स्तरांपर्यंत नवीन गोष्टी जोडत जाते, ज्याचा कर्मचाऱ्याने विचारही केलेला नसतो किंवा ज्यांची गरजही नसते. एआयच्या याच सवयीमुळे वापरकर्ता एकाच कामाच्या खोलात शिरत जातो आणि थकून जातो. 'ॲक्टिव्हट्रॅक' या उत्पादकता ट्रॅकिंग सॉफ्टवेअर कंपनीने नुकताच कामाच्या सवयींवर होणाऱ्या एआयच्या परिणामाचा एक मोठा अभ्यास पूर्ण केला. यामध्ये 1,111 नियोक्त्यांच्या 1.64 लाख कर्मचाऱ्यांच्या 44 कोटी तासांहून अधिक डिजिटल क्रियाकलापांचा अभ्यास करून काही मनोरंजक तथ्ये समोर आणली आहेत. एआय टूल्स वापरण्यापूर्वीच्या आणि नंतरच्या 180 दिवसांतील कर्मचाऱ्यांच्या हालचालींचे निरीक्षण केल्यावर असे आढळले की, जवळपास सर्वच क्षेत्रांत कामाचा वेग वाढला. ईमेल, मेसेजिंग आणि चॅट ॲप्सवर घालवला जाणारा वेळ दुपटीहून अधिक झाला. दुसरीकडे, एकाग्रतेने आणि कोणत्याही व्यत्ययाशिवाय केल्या जाणाऱ्या कामाचा वेळ 9 टक्क्यांनी कमी झाला. हा तो वेळ असतो जो गुंतागुंतीच्या समस्या सोडवण्यासाठी, नवीन कल्पना तयार करण्यासाठी आणि त्या लागू करण्यासाठी आवश्यक असतो. प्रशासकीय कामे स्वयंचलित(ऑटोमेट) करण्यासाठी ज्या कंपन्यांनी एआय विकसित केले, त्यांनाही याचा फटका बसत आहे. कारण स्वयंचलित कामच पूर्ण होत नाहीये. कर्मचारी तेच काम वारंवार करणे, त्यात सुधारणा करणे आणि पुन्हा एआयच्या सूचना जोडण्यात गुंतलेले असतात. यात जास्त वेळ खर्ची पडतो. लोक कमी नाही
तर जास्त काम करत आहेत. बर्कले येथील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाच्या हास स्कूल ऑफ बिझनेसमधील सहयोगी प्राध्यापिका अरुणा रंगनाथन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, 'एआय आपल्याला अतिरिक्त कामात गुंतवून ठेवते. ते काम काही प्रमाणात सोपे करत असले तरी आपण त्यात अडकून पडतो, ज्यामुळे फक्त वेगाने काम केल्याची जाणीव होते.' एआय टूल्ससोबत काम करण्याचा सरासरी वेळ आठपटीने वाढला असल्याने, एआयचा वापर कसा करावा की ऊर्जा आणि उच्च उत्पादकता दोन्ही टिकून राहतील? तज्ज्ञांच्या मते, जे लोक आपल्या एकूण कामाच्या वेळेपैकी 7 ते 10 टक्के वेळ एआय टूल्सवर खर्च करतात, त्यांची उत्पादकता सर्वाधिक असते. फंडा हा आहे की, एआय ही दुधारी तलवार आहे. ते तुम्हाला वेगाने पुढे नेऊ शकते, पण अधिक खोलात जाण्यासाठी भुरळही घालू शकते. जर तुम्ही एकाच कामाच्या खोलात जात राहिलात, तर पुढचे काम करण्यासाठी तुम्ही पुन्हा मूळ पातळीवर येऊच शकणार नाही. त्यामुळे सध्या तरी याचा वापर संयमाने करणेच हिताचे आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:नूतन वर्ष आध्यात्मिक साधनेसाठी खूप अनुकूल
- आशुतोष वार्ष्णेय यांचा कॉलम:इराणमधील युद्ध कधी अन् कसे बरे संपेल?
- आरती जेरथ यांचा कॉलम:ऐन निवडणुकीच्या तोंडावरच मतदार यादीवरून वादंग
- अर्घ्य सेनगुप्ता-स्वप्निल त्रिपाठी यांचा कॉलम:धार्मिक व्यवस्थेसाठीदेखील कोर्टाचा आधार कशामुळे?
महाराष्ट्र
- आशुतोष वार्ष्णेय यांचा कॉलम:इराणमधील युद्ध कधी अन् कसे बरे संपेल?
- आरती जेरथ यांचा कॉलम:ऐन निवडणुकीच्या तोंडावरच मतदार यादीवरून वादंग
- अर्घ्य सेनगुप्ता-स्वप्निल त्रिपाठी यांचा कॉलम:धार्मिक व्यवस्थेसाठीदेखील कोर्टाचा आधार कशामुळे?
- डॉ. विकास अग्रवाल यांचा कॉलम:निद्रानाश एक समस्या, वारंवार झोपमोड ही त्याहून मोठी समस्या
गुन्हा
- आशुतोष वार्ष्णेय यांचा कॉलम:इराणमधील युद्ध कधी अन् कसे बरे संपेल?
- आरती जेरथ यांचा कॉलम:ऐन निवडणुकीच्या तोंडावरच मतदार यादीवरून वादंग
- अर्घ्य सेनगुप्ता-स्वप्निल त्रिपाठी यांचा कॉलम:धार्मिक व्यवस्थेसाठीदेखील कोर्टाचा आधार कशामुळे?
- डॉ. विकास अग्रवाल यांचा कॉलम:निद्रानाश एक समस्या, वारंवार झोपमोड ही त्याहून मोठी समस्या
राजकीय
- मिरज पंचायत समितीत काँग्रेसची बाजी, भाजपच्या बालेकिल्ल्यात आघाडीचा धक्का
- आरती जेरथ यांचा कॉलम:‘आप’ नेत्यांच्या सुटकेनंतर काँग्रेस पक्ष चिंताक्रांत का?
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
इतर
- सरकार तुमचे बँक खाते गोठवू शकत नाही: आर्थिक संकटाच्या व्हायरल दाव्याची पडताळणी
- नाशिकमध्ये निवडणुकीतील पराभव जिव्हारी, राजकीय नेत्याचा युवकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला
- राज्यात उन्हाचा कडाका वाढला: उष्माघातापासून बचावासाठी आरोग्य विभागाकडून 'अॅडव्हायजरी' जारी; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
- Pune- पुणे महापालिकेचा मोठा निर्णय! २३ गावांच्या विकासासाठी ९५४ कोटींचा ‘बूस्टर डोस’
मनोरंजन
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
विडियो गॅलेरी

संगमनेरमध्ये धक्कादायक घटना! 😡शाळेतून घरी जाणाऱ्या 10-12 वर्षांच्या मुलीवर थेट ॲसिड हल्ला 💔
पुण्यातील रिंग रोड प्रकरणाने मोठा वाद निर्माण केला आहे! 😳 #pmrda #punebatamya
लोकसभा का ठप्प झाली? संसदेतल्या गदारोळावर राहुल गांधींचं मोठं विधान… पाहा सविस्तर
देश विदेश
- Mumbai : महाराष्ट्रात एलपीजी संकट! पश्चिम आशियातील युद्धामुळे गॅस पुरवठा विस्कळीत; गॅस एजन्सींना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश
- नांदेडच्या औद्योगिक शिरपेचात मानाचा तुरा! ४,२५० कोटींचा हेलिकॉप्टर प्रकल्प जाहीर; हजारो तरुणांना मिळणार रोजगार
- LPG टंचाई: सिलिंडर वाहनांना पोलीस सुरक्षा द्या आणि तात्काळ 'कंट्रोल रुम' उभारा; राज्य सरकारचे जिल्हाधिकाऱ्यांना कडक निर्देश
- गॅस टंचाई हाताळण्यासाठी केंद्र सरकार सरसावले: हॉटेल्सना पर्यायी इंधन, राज्यांना अतिरिक्त रॉकेल





















Subscribe to my channel



