पुणे : काँग्रेसच देश सांभाळू शकते असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले केला आहे

पुणे - भाजपकडून (BJP) केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग करणे सुरू आहे. त्याला जनता कंटाळली आहे. राहुल गांधी यांच्याकडे व्हिजन आहे. या देशाला पुढच्या काळात काँग्रेस सांभाळू शकते, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना केला.

पुण्यात कार्यक्रमासाठी आले असताना पत्रकारांनी त्यांची भेट घेतली. त्या वेळी ते बोलत होते. सोनिया गांधी या ‘यूपीए’चे नेतृत्व करण्यास सक्षम आहेत, असे ट्विट पाटोले यांनी केले होते. त्यावर विचारले असता ते म्हणाले, ‘‘देशपातळीवर भाजपला मोडीत काढायचे असेल, तर काँग्रेसशिवाय पर्याय नाही. राज्य पातळीवरील पक्षांनी याचा विचार केला पाहिजे. नाही केला तर ती भाजपला मदत करण्यासारखे आहे.’’

पक्षाच्या आमदारांनी सोनिया गांधी यांना भेटीची वेळ मागितली आहे, त्यावर बोलताना ते म्हणाले, ‘‘हे तीन पक्षाचे सरकार आहे. थोडं कमी जास्त होणारच. आमदार आपल्या मतदार संघात काम. करतात त्यांना पक्ष अध्यक्षांना भेटायची इच्छा असते ते भेटू शकतात. त्यासाठी भाजपच्या प्रमाणपत्राची गरज नाही. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना आमदार भेटायला जाणार आहे, त्याचा इतका बाऊ विरोधक का करत आहेत. हे कळत नाही.’’



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply