T20 World Cup 2026: १२ वर्षांनंतर चमत्कार घडला! टी२० वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदा नेपाळनं जिंकला सामना, स्पर्धेचा शेवट गोड

image

नेपाळने २०१४ मध्ये पहिल्यांदा टी२० विश्वचषकात भाग घेतला होता, त्यात त्यांनी हाँगकाँग आणि अफगाणिस्तानचा पराभव केला होता. त्यानंतर २०२४ पर्यंत त्यांना एकही सामना जिंकता आलेला नव्हता. आता थेट १२ वर्षांनंतर त्यांनी स्पर्धेतील विजयाचा दुष्काळ संपवला. नेपाळकडून दीपेंद्र सिंग ऐरीने फलंदाजीत आणि सोमपाल कामीने आपल्या गोलंदाजीत शानदार कामगिरी केली आहे. दीपेंद्रने शानदार फलंदाजी केली, नाबाद राहत २३ चेंडूत त्याने ५० धावा केल्या आणि सामना जिंकवला. तर कामीने गोलंदाजीत शानदार खेळी करत ३ विकेट घेतल्या.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *