Sambhajinagar : अतिवृष्टीनं पीक गेलं, मुलीच्या कॉलेजची फी कशी भरायची? हतबल झालेल्या शेतकऱ्याची आत्महत्या

 

Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अतिवृष्टीमुळे हाता तोंडाशी आलेले पीक गेलं, डोक्यावर कर्जाचा डोंगर, एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या लेकीची फीस भरायची कशी? यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलले. बकापूर-पळशी गावातील शेतकऱ्याने गळफास घेत आयुष्य संपवलं. या घटनेमुळे संभाजीनगरमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरच्या बकापूर-पळशी या गावात ही घटना घडली. मधुकर सर्जेराव पळसकर असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या शेतकऱ्याने गळफास घेत आयु्ष्य संपवलं. संभाजीनगरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. मधुकर पळसकर या शेतकऱ्याच्या शेतीचे देखील नुकसान झाले.

मधुकर यांनी मोठ्या कष्टाने शेतात कोबीची लागवड केली होती. पण गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे हाता तोंडाशी आलेली कोबी पीक अतिवृष्टीमुळे सासलेल्या पाण्यात नष्ट झाले. काढलेलं कर्ज कसे फेडायचे आणि हैदराबाद येथे एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या लेकीची फी कशी भरायची? या चिंतेतून मधुकर यांनी गळफास घेऊन आयुष्य संपवलं.

निसर्गामुळे अगोदरच संकटात असलेल्या पळसकर यांच्या कुटुंबाला मधुकर यांच्या आत्महत्येमुळे मोठा धक्का बसला. घरातल्या कर्त्या पुरुषांने आत्महत्या केल्यामुळे पळसकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन विवाहित मुली आणि मुलगा असा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *