Ramdas Athawale : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचं मराठा आरक्षणावर मोठं विधान, मनोज जरांगेंनाही दिला महत्वाचा सल्ला

Ramdas Athawale : राज्यात आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राज्याचं वातावरण तापलं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा लावून धरला आहे. याच मराठा आरक्षणाच्या मागणीवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भाष्य केलं आहे.'मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला वेळ द्यावा, असा सल्ला केंद्रीय मंत्री आठवले यांनी दिला आहे.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले आज गुरुवारी यवतमाळच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मराठा आरक्षणासहित राज्यातील विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.

COVID JN1 Variant : नागरिकांनो घाबरू नका, काळजी घ्या; मुख्यमंत्र्यांकडून आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा

'मराठा समाजातील गरिबांना आरक्षण मिळावे. सर्वच मराठा समाजातील लोक श्रीमंत नाहीत. जरांगेच्या मागणीप्रमाणे सरसकट दाखले देऊन प्रश्‍न सुटणार नाहीत. आमचा जरांगे यांच्या मागणीला पाठिंबा आहे. परंतु, जरांगे यांनी राज्य सरकारला वेळ द्यावा. सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करू नये, असा सल्ला मंत्री रामदास आठवले यांनी मनोज जरांगे यांना दिला आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply