Raju Shetti : दुधाच्या बाजारभावाचा प्रश्न मार्गी लावा; राजू शेट्टी यांची मागणी, आंबेगाव तालुक्यात शेतकरी मेळावा

Raju Shetti : "शेतकऱ्यासाठी अनेक वर्षापासून स्वाभिमानी शेतकरी संघटना संघर्ष करत आहे. कोणाचेही सरकार असो, शेतकऱ्यांसाठी लढा हेच आमचे कर्तव्यच आहे. शेतकऱ्याची मागणी दुधाला प्रतिलिटर ४० रुपये बाजारभाव मिळाला पाहिजे. लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुती सरकारला फटका बसला आहे. दुधाच्या बाजारभावाचा प्रश्न मार्गी लावा, अन्यथा विधानसभा निवडणुकीत तुमचे काही खरे नाही," असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.
पिपळगाव खडकी येथे बुधवारी आयोजित शेतकरी मेळाव्यात शेट्टी बोलत होते. यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर, वनाजी बागर, बाबाजी खानदेशी, प्रकाश कोळेकर, रामदास बांगर, रामनाथ बांगर, भूषण आवटे, ममेश बोराडे आदी उपस्थित होते. राजू शेट्टी म्हणाले, "शेतीमालाला व दुधाला बाजारभाव मिळावा म्हणून संघर्ष सुरू आहे. शेतीमालालाही योग्य बाजारभाव मिळण्यासाठी शेतकरी वगनि संघटित झाले पाहिजे. "

Manoj Jarange : मनोज जरांगे यांच्या सुरक्षेत वाढ; मंत्री शंभुराज देसाईंची माहिती, 'अशी' असेल सुरक्षा व्यवस्था...

वय २५-५० दरम्यानर २२ करोडच्या टर्म विमासाठी पात्रता तपासा

यावेळी प्रभाकर बांगर, संतोष पवार, तुकाराम गावडे, संतोष इंदोरे, सविता पोखरकर, दीपक पोखरकर, नवनाथ पोखरकर, स्वप्नील बांगर यांची भाषणे झाली. संदीप वाबळे यानी सूत्रसंचालन केले. पशुखाद्याच्या वाढलेल्या बाजारभावामुळे दूध उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. अडचणीत असलेल्या शेतक-यांना सावरण्यासाठी त्यानी उत्पादित केलेल्या दुधाला योग्य बाजारभाव देणे, हे शासनाचे कर्तव्य आहे. शेतकऱ्याच्या दुधाला अनुदान देताना अटी लावू नका. विधानसभेला फटका बसायची वाट पाहू नका दूध दसकडे दुर्लक्ष करणाऱ्या पुढाऱ्याऱ्यांना यापुढे दुधाने अंघोळ घालण्याचे आदोलन करावे लागेल.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply