Pune News : धक्कादायक! प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहित महिलेची आत्महत्या; कात्रज परिसरातील घटना

Pune News : कात्रज परिसरातील दरी पुलावरून उडी मारून एका विवाहित महिलेनं जीवन संपवलं आहे. प्रियकराच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याची माहिती मिळतेय. याबाबत सविस्तर वृत्त असं की, ही घटना कात्रज परिसरातील जांभूळवाडी येथे एक जून रोजी घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पैशांच्या देवाण घेवाणीतून  शिरूर तालुक्यातील एका विवाहित महिलेची परपुरुषाशी ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात  झालं. परंतु त्यानंतर प्रियकराने महिलेला त्रास देण्यास सुरुवात केली. त्याच्या त्रासाला कंटाळून या विवाहित महिलेने कात्रजजवळ दरी पुलावरून उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणी पतीने तक्रार (वय ४७) दिली आहे.

Maharashtra Loksabha Election Result : महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकालावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

त्यावरून भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात रहीम शेख (रा. कागजीपुरा, कसबा पेठ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी शेख याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शेखची या विवाहित महिलेची ओळख झाली होती. तिने शेख याच्याकडून पैसे घेतले होते. ओळखीतून त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. परंतु त्यानंतर शेखने महिलेला माझ्यासमवेत राहायला न आल्यास कुटुंबीयांना जीवे मारू, अशी धमकी दिली होती. शेख त्रास देत असून, माझी चूक झाली. मला जगण्याची इच्छा राहिली नाही, असे तिने पतीला सांगितले होते.

दरम्यान, या महिलेने एक जूनच्या पहाटे चारच्या सुमारास दरी पुलावरून उडी मारून आत्महत्या केली. याबाबत पतीने पोलीस ठाण्यात तक्रारदिली होती. वरिष्ठ पोलिस निरीक्षक दशरथ पाटील, पोलिस निरीक्षक (गुन्हे) शरद झिने यांनी घटनास्थळी भेट दिली. महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक मिथुन परदेशी करीत आहेत.

 
 


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply