Pune : उरूळी देवाची आणि फुरसुंगी या गावात विविध विकासकामे करण्यासाठी महापालिकेने आतापर्यंत पाचशे कोटीं रुपयांचा खर्च केले आहेत. आता या दोन्ही गावांची स्वतंत्र नगर परिषद स्थापन केल्याने पुणेकरांच्या कराच्या पैसा वाया गेला आहे.या गावांवर गेल्या पाच वर्षांत सुमारे २५० कोटी रुपये या गावांमध्ये खर्च झाले आहेत. कचरा भूमीमुळे निर्माण झालेल्या समस्येवर सन २००८ पासून २०० कोटींपेक्षा जास्त खर्च करण्यात आला आहे. तसेच सांडपाणी व्यवस्थापनाअंतर्गत समाविष्ट ११ गावांच्या ३९२ कोटी रुपयांच्या आराखड्यापैकी या दोन्ही गावांत ४२ कोटी रुपयांची तरतूद आहे. या दोन्ही गावांत ३७१ हेक्टर क्षेत्रावर प्रादेशिक नगर नियोजन योजना (टीपी स्कीम) राबविण्याचेही नियोजित आहे. मात्र, या दोन्ही गावांची मिळून नगरपरिषद स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याने हा खर्च पाण्यात जाण्याची शक्यता आहे.
उरूळी देवाची आणि फुरसुंगी या दोन गावांची मिळून नगरपरिषद स्थापन करण्यात येणार आहे. त्याबाबतची अधिसूचना राज्याच्या नगरविकास विभागाने काढली आहे. राज्य शासनाच्या या निर्णयाचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली असून ग्रामस्थांना विचारात न घेता या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने या गावांमध्ये आतापर्यंत केलेल्या खर्चाची माहिती घेतली असता, महापालिकेने गेल्या काही वर्षात पाचशे कोटींहून अधिक खर्च या गावांमध्ये केल्याचे स्पष्ट झाले आहे. यातील काही कामे सुरू असून काही प्रस्तावित आहेत. त्यामुळे महापालिकेचा हा खर्च पाण्यात जाण्याची शक्यता आहे.
Pune : प्राध्यापक भरती नव्याने जाहिरात; १११ जागांवर दोन महिन्यांत भरती? |
उरुळी देवाची आणि फुरसुंगी या गावांचा ऑक्टोबर २०१७ मध्ये महापालिका हद्दीत समावेश करण्यात आला होता. त्यानंतर महापालिका प्रशासनाकडून दोन्ही गावात विकासकामे सुरू करण्यात आली होती. गेल्या पाच वर्षांत सुमारे २५० कोटी रुपये या गावांमध्ये खर्च झाले आहेत. तसेच ३९२ कोटी रुपयांच्या सांडपाणी वहन आराखड्यामध्ये या दोन्ही गावांमध्ये सुमारे ४२ कोटी रुपये खर्च करण्याचे प्रस्तावित असून त्यातील काही खर्चही करण्यात आला आहे.
उरूळी देवाची आणि फुरसुंगी येथील नागरिकांनी कचरा भूमीमुळे अनेक वर्षे समस्यांना तोंड दिले आहे. कचरा भूमीला विरोध करण्यासाठी नागरिकांनी आंदोलने करून कायदेशीर लढा दिल्याने या गावांमध्ये कचरा टाकणे बंद झाले. या ठिकाणच्या साठलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने दोनशे मेट्रिक टन क्षमतेचा कचरा प्रकल्पही सुरू केला. कचरा प्रक्रिया, वृक्ष लागवड अशा विविध कामांसाठी महापालिकेकडून २०० कोटींपेक्षा जास्त खर्च करण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. तसेच या गावांतील नागरिकांना २००८ पासून टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो. रस्त्यांचीही कामे करण्यात आली. ही दोन्ही गावे महापालिकेत समाविष्ट करण्यात आल्यानंतर आतापर्यंत सुमारे २५० कोटी रुपयांची विकासकामे करण्यात आली आहेत. दोन्ही गावांमध्ये राबवल्या जाणाऱ्या प्रादेशिक नगरनियोजन (टीपी) योजनेच्या कामांसाठी महापालिकेने सातशे कोटींचा निधी उभारणीसाठीचे प्रयत्न सुरू केले होते. तसेच सांडपाणी व्यवस्था आणि पावसाळी गटारांच्या कामांचेही नियोजनही महापालिकेने केले होते.
राज्य शासनाच्या निर्णयाला विरोध
उरूळी देवाची आणि फुरसुंगी गावांची मिळून नगरपरिषद करण्याच्या निर्णयाला ‘आपले पुणे’ संस्थेचे उज्ज्वल केसकर, माजी विरोधी पक्षनेते सुहास कुलकर्णी आणि माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी विरोध दर्शविला आहे. महापालिकेने या गावांसाठी नगर रचना योजना तयार केली असून जवळपास जमिन मालकांचे १००० कोटी रुपये बेटरमेंट चार्जेस माफ केले आहेत. या दोन गावांमध्ये मालमत्ता कराची थकबाकी २०० कोटी रुपयांची आहे.अकरा गावांच्या विकास आराखड्यातून ही दोन गावे वगळावी लागतील. ही गावे वगळल्या नंतर उर्वरित नऊ गावांचे नियोजन महापालिकेला करावे लागणार असल्याने या निर्णयाला विरोध असल्याचे केसकर यांनी स्पष्ट केले.
शहर
महाराष्ट्र
- Santosh Deshmukh Case: धाराशिवच्या कळंबमध्ये कुजलेल्या अवस्थेत सापडला होता महिलेचा मृतदेह, बीड कनेक्शन आलं समोर
- Latur Crime : शिक्षकच बनला भक्षक! ३ महिन्यांपासून मुलांवर अनैसर्गिक अत्याचार
- Mumbai : निसर्ग उन्नत मार्गावर पर्यटकांची झुंबड, सर्व स्लॉट हाऊसफुल्ल
- Maharashtra Weather Update : हवामान खात्याकडून 'या' भागात गारपीटचा येलो अलर्ट, अवकाळीचे ढग कायम
गुन्हा
- Mumbai Crime : खळबळजनक! मुंबईत ३८ दिवसांच्या बाळाची विक्री करण्यासाठी चोरी? पोलिसांनी असा उधळला चोरट्यांचा डाव
- Pune : शनिवार पेठेतून दुचाकी चोरणारा गजाआड, चोरट्याकडून दुचाकी चोरीसह घरफोडीचे गुन्हे उघड
- Pune Crime : टोळक्याकडून निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला मारहाण; तलवारी उगारुन घरातील साहित्याची तोडफोड
- Ghatkoper Crime : नकोशी! पाळण्याच्या दोरीनेच ४ महिन्याच्या लेकीचा बापाने जीव घेतला, घाटकोपर हादरलं
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Supreme Court : 'स्तन पकडणे बलात्कार नाही...', हायकोर्टाच्या या निर्णायावर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे
- CM Chandrababu Naidu : ‘तिरुपती मंदिरात फक्त हिंदूंनीच काम करावं’, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचं मोठं विधान
- Bill Gates : “भारत अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने विकसित होतोय”, बिल गेट्स यांच्याकडून कौतुक; म्हणाले, “नवनिर्मितीचं केंद्र…”
- Vasanthy Cheruveetil : कुठल्याही प्रशिक्षणाशिवाय ५९ वर्षीय भारतीय महिलेने सर केलं एव्हरेस्ट, यूट्युबवरून घेतलेले धडे; पुढचं लक्ष्यही ठरवलं