मांजरी खुर्द : मांजरी खुर्द कोलवडी (ता. हवेली) नगर रचना योजना क्रमांक ११ नुकतीच पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) अंतिम मंजुरीसाठी सरकारला सादर केलेली आहे.
मात्र, नगर विकास प्रशासन व लवादासमोर केलेल्या लेखी व तोंडी तक्रारीकडे दुर्लक्ष करून ही योजना पुढे रेटण्यात आल्याचा आरोप योजनेतील बाधित पस्तीस मिळकतदारांसह १४० शेतकऱ्यांनी केला आहे.
योजनेतील नियोजनाचा अभाव व जाचक अटींमुळे बहुतांश शेतकऱ्यांच्या निवासाचा व उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अंतिम भूखंड वाटपात अनेक शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. नगर विकास प्रशासन व लवादासमोर लेखी व तोंडी तक्रार करूनही त्रुटी कायम ठेवत योजना सरकारकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात आली आहे. दोन्ही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांमध्ये नैराश्य आहे.
"शेतकऱ्यांसाठी चांगली योजना असल्याचे सांगत व विश्वासात घेऊन योजना केली जाईल', असे सांगून प्रशासनाने आमची फसवणूक केली आहे. शेतकऱ्यांना पन्नास टक्के ऐवजी केवळ ४८.८७ टक्के भूखंडाचे वाटप केले आहे.
पस्तीस टक्के पेक्षा जास्त क्षेत्रावर पीएमआरडीएने स्वतः मालकी ठेवली आहे. मोक्याचे भूखंड राजकीय दबाव आणि जवळच्या शेतकऱ्यांना वाटप केले आहेत. पीएमआरडीएच्या नकाशानुसार येथील रिंग रोड ११० मीटर प्रस्तावित होता, नवीन सुधारित नकाशावर तो ६५ मीटर केला आहे. त्यामुळे राहिलेले ११.६५ एकर क्षेत्राचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे
योजनेत जाहीर केलेले क्षेत्र ५५६ एकर आहे मात्र, प्रत्यक्षात ते पाचशे साठ एकर भरत आहे. राहिलेले चार एकर क्षेत्र पीएमआरडीएने स्वतःजवळ ठेवले आहे ५५६ एकर पैकी पन्नास टक्के प्रमाणे २७८ एकर क्षेत्राचे वाटप होणे आवश्यक होते. मात्र, केवळ २७३ एकर क्षेत्र वाटप केले आहे. पाच एकर क्षेत्र पीएमआरडीएने स्वतः जवळ ठेवले आहे,' असा आरोप शेतकरी व मिळकतदारांनी केला आहे.
टी.पी. योजनेसाठी एकूण संपादन केल्या जाणाऱ्या क्षेत्रापैकी साठ टक्के क्षेत्र शेतकऱ्यांना मिळावे. राहती घरे आणि वस्तीपड क्षेत्र योजनेतून वगळावे. विखुरलेले क्षेत्र शेतकऱ्यांच्या सोयीनुसार एक ठिकाणी मिळावे.
संरक्षण खात्या शेजारील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून तेथे अमिनिटी स्पेस निर्माण करावी व शेतकऱ्यांचे नुकसान टाळावे. या भागातून गेलेल्या हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या वाहिनीवर काही शेतकऱ्यांना भूखंड देण्यात आले आहेत ते बदलून इतर सोयीस्कर ठिकाणी मिळावेत. अशी मागणी शेतकरी व मिळकतदारांनी केली आहे.
प्रशासनाने अन्यायकारक पद्धतीने शेतकऱ्यांवर योजना लादू नये. सरकारने योजना आहेत अशी मंजूर न करता शेतकरी व प्रशासनतील समन्वयाने पुनर्रचना करावी. शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
सध्या प्रशासनाकडून शेतकरी व मिळकतदारांचा विचार न करता योजनेची आखणी केली जात आहे. आम्ही शेतकरी व मिळकतदार या योजनेसाठी सकारात्मकता दाखवीत असलो तरी त्याची मांडणी योग्य पध्दतीने होणे आवश्यक आहे. त्यातील त्रुटींबाबत न्याय मिळावा, यासाठी मुख्यमंत्र्यांपासून पी.एम.आर.डी.ए. च्या आयुक्तांपर्यंत विविध ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांनी निवेदने दिली आहेत.'
प्रकाश सावंत, रविंद्र काकडे शेतकरी, मांजरी खुर्द
"दोन महिन्यांपासून वेळोवेळी शेतकरी व मिळकतदारांना विश्वासात घेऊन टी.पी. स्कीमची आखणी केली आहे. मात्र, आजूनही शेतकऱ्यांमध्ये संभ्रम असल्याचे त्यांनी कार्यालयाकडे दिलेल्या निवेदनावरून दिसत आहे. येत्या मंगळवारी (ता. २१) आयुक्तांच्या सूचनेनुसार या शेतकऱ्यांची बैठक बोलावली आहे. त्यातून योग्य मार्ग निघेल.'
रामदास जगताप उपजिल्हाधिकारी, पी.एम.आर.डी.ए.
शहर
- Bhiwandi Crime News : सासऱ्याचा २० वर्षीय सुनेवर डोळा; खोलीत डांबलं, मित्रासह नवविवाहितेवर बलात्कार
- Pune Metro : पुणेकरांच्या कामाची बातमी! स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गात २ स्थानके वाढली; कोणत्या भागाला होणार फायदा?
- Kalyan News : कल्याण डोंबिवलीत पार्किंग ठरतेय डोकेदुखी, दरवर्षी शहरात लाखो वाहनांची भर, केडीएमसीचे वाहनतळे अपुरे
- Kalyan News : रेल्वे स्टेशनजवळ पंचनाम्यासाठी गेले, API घटनास्थळी पोहोचताच नको ते घडलं; लोकलच्या धडकेनं...
महाराष्ट्र
- Fake Currency :1 लाख रुपयांच्या बदल्यात 6 लाखांच्या नोटा; नंदुरबार आणि कोल्हापूरमध्ये बनावट नोटांचा सुळसुळाट
- 10th Board : तिघांना अटक! झेरॉक्स केंद्रात उत्तरपत्रिका पोहोचली कशी?
- Ambernath : अंबरनाथ पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे शहरात कचऱ्याचे ढीग, सफाई कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन
- MSRTC ST Bus Attack : बस चालकाला मारहाण प्रकरण; महाराष्ट्र-कर्नाटक एसटी बस वाहतूक थांबवली,मारहाण प्रकरणानंतर ठाकरे गट आक्रमक
गुन्हा
- Pune Crime : वाहतूक पोलिसावर दगडाने हल्ला करणारा गजाआड; ज्या चौकात हा प्रकार घडला त्याच चौकात त्याची पोलिसांनी काढली धिंड
- Pune Crime : घरी कुणी नसताना टोकाचं पाऊल, पुण्यात पोलिस कर्मचाऱ्याच्या मुलाने आयुष्याची दोर कापली
- Pune Crime : पुण्यात NDA हद्दीजवळ पाकिस्तानी चलनातील नोट सापडल्याने खळबळ
- Koyta Gang : कोथरुड मध्ये कोयता गॅंगची दहशत; भर रस्त्यावर दुचाकी चालकावर हल्ला, एक जण गंभीर जखमी
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- CBSE New Rule : दहावीची परीक्षा वर्षातून दोनदा? सीबीएसई नवा नियम लागू करण्याच्या तयारीत
- Mahakumbh Mela 2025 : महाकुंभातील चेंगराचेंगरीत बेपत्ता झाला अन् तेराव्यालाच प्रकटला, म्हणाला, 'साधूंबरोबर चिल्लम मारत होतो..'
- Delhi Railway Station Stampede: दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत जाहीर
- New Delhi Railway Station Stampede : १८ जणांच्या मृत्यूला रेल्वे जबाबदार, दिल्ली स्टेशनवरच्या चेंगराचेंगरीचं कारण समोर