Pandharpur Ashadhi Yatra : आषाढी यात्रेवर पुराचे सावट; मुसळधार पावसामुळे उजनी धरण ७४ टक्के भरले, भीमा नदीत होणार विसर्ग

Pandharpur : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणातील पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दोन दिवसात धरणात ७५ टक्के भरले असून असाच पाऊस काही दिवस सुरू राहिला; धरण पूर्ण भरून नदीत विसर्ग करावा लागणार आहे. परिणामी आषाढी यात्रेवर पुराचे सावट निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात

पंढरपूरची आषाढी यात्रा अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपली आहे. आषाढी यात्रेसाठीचे सर्व नियोजन व तयारी झाली आहे. शिवाय आतापासून भाविकांचा दर्शनासाठी येण्याचा ओघ सुरु झाला आहे. दरम्यान मुसळधार पाऊस होत असल्याने अनेक भागात पर्जन्य परिस्थिती आहे. प्रामुख्याने पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु आहे. पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दौंड येथून उजनी धरणात सुमारे ५८ हजार क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे.

Ambernath News : अंबरनाथमध्ये स्कूल व्हॅनमधून विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक, एका गाडीत कोंबतात २० मुलं

भीमा नदीत ४० हजार क्युसेकने होणार विसर्ग

दोन दिवसांमध्ये उजनी धरण जवळपास ७५ टक्के भरेल अशी शक्यता आहे. त्यामुळे उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रात पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे. त्यातच वीर धरणातून नीरा नदीत २ हजार क्युसेक पाणी सोडले जात आहे. उजनी धरण ७४ टक्के भरल्यानंतर भीमा नदी पात्रात पाणी सोडले जाईल असे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी यापूर्वीच सांगितले आहे. जर उजनी धरणातून किमान ४० हजार क्युसेक इतका विसर्ग भीमा नदी पात्रात सोडला; तर पंढरपुरात चंद्रभागा नदी दूथडी भरून वाहते.

तर पंढपुरात पूरस्थिती

चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहिल्यास नदीकाठच्या सर्व घाटांना पाणी लागते. मंदिरेही पाण्याखाली जातात. दगडी पूल पाण्यात खाली गेल्याने तो बंद करावा लागतो. ऐन आषाढीच्या तोंडावर उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रात पाणी सोडले, तर पंढरपुरात पूरस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आषाढी यात्रेवर पुराचे सावट येण्याची दाट शक्यता आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *