Navi Mumbai Crime : १२ हजार पगार, वाजवी पगारात खर्च भागेना; नवी मुंबईतल्या तरुणीच्या आत्महत्येचं कारण समोर

New Mumbai : कुटुंबाची जबाबदारी पेलण्यासाठी केवळ राज्यातूनच नाही, तर परराज्यातून लोक मुंबईत येत असतात. उत्तर प्रदेशातील कानपूरहून एक तरुणी मुंबईमध्ये नोकरीसाठी आली होती. ती एका कंपनीत कर्मचारी म्हणून रुजू झाली. पण तिचा अपेक्षाभंग झाल्यानं तिने आत्महत्या केली. तिचं नाव नंदिनी (वय २२) असं आहे. तिनं आर्थिक चणचणीतूनच आपलं जीवन संपवलं. ही घटना नवी मुंबईतील ऐरोलीत घडली आहे.

आर्थिक चणचणीतून केली आत्महत्या

नंदिनीच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची होती. त्यामुळे नंदिनीने कानपूर सोडून नवी मुंबई गाठली. त्यानंतर ती नवी मुंबईतील ऐरोलीतील सेक्टर १ मध्ये पेईंग गेस्ट म्हणून राहू लागली. अशावेळी घरभाडे आणि आई वडिलांच्या आजारपणाचा खर्च झेपत नसल्यानं तिनं आत्महत्या केली. १२ हजार वेतनावर ती एका कंपनीत नोकरी करायची. मात्र, या वाजवी पगारात तिचा सर्व खर्च भागत नव्हता.

तिचे सहकारी गावी गेल्यानं काही दिवसांपासून ती एकटीच राहू लागली होती. तिच्या स्वभावाने तिची शेजाऱ्यांशी चांगली मैत्री झाली होती. शनिवारपर्यंत तिने कोणाशीही संपर्क केला नाही. घराचा दरवाजा आतून बंद असल्याचं पाहून शेजाऱ्यांनी रविवारी दुपारी बनावट चावीचा वापर करत बंद असलेला दरवाजा उघडला. अशावेळी तिचा गळफास घेतलेला मृतदेह दिसून आला.

Ulhasnagar : मावळनंतर उल्हासनगरचा पूल कोसळला; ५०० जणांचा संपर्क तुटला, पूल खचला पण..

डायरीत सुसाईड नोट

अशावेळी तिने एका डायरीत मनातली सल व्यक्त करत लिहिली आणि आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिने डायरीत लिहिलं की, मिळणाऱ्या पगारातून काही भागत नसल्याची खंत तिने व्यक्त केली आहे. संबंधित प्रकरणात पोलिसांनी तपास केला आहे.

महिला पोलीस निरीक्षक वृषाली पवार यांनी सांगितलं की, तरुणीने आर्थिक अडचणीतूनच पुन्हा कानपूरला जाण्याचा निर्णय घेतला होता, असं तिने मैत्रिणीला सांगितलं होतं. मुंबईत येऊन तिचा अपेक्षाभंग झाल्यानं तिने आत्महत्या केली. याबबत तिच्या कुटुंबियांना कळवलं असून यातील पुढील अधिक तपास सुरु आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply