Mumbai News : मुंबई आणि परिसरातील प्रदूषण कमी करण्यासाठी राज्य सरकार आणि महापालिकेने विविध प्रयोग हाती घेतले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी घेतलेल्या बैठकीत कृत्रिम पावसाचा प्रयोग, पाणी फवारण्यासाठी एक हजार टँकरचा पुरवठा करण्यासह अनेक सूचना केल्या. तर शहरात प्रवेश करणाऱ्या गाड्यांमुळे धूळ पसरत असल्याचा दावा करीत प्रवेशद्वारांवर चाके धुण्याचा प्रयोग पालिका करणार आहे.
मुंबईतील प्रदूषणावरून उच्च न्यायालयाने महापालिकेसह संबंधित यंत्रणांना फटकारल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी या विषयावर बैठक घेतली. बैठकीला मुख्य सचिव मनोज सौनिक मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव गोविंदराज, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्मा, परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन उपस्थित होते. याखेरीज सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलिस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून बैठकीत सहभागी झाले होते. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी अनेक सूचना केल्या. उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी महापालिका व विविध सरकारी यंत्रणांनी एकत्रितपणे काम करावे, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. तसेच नागरिकांना प्रदूषण रोखण्याच्या मोहिमेमध्ये सहभागी करून लोकचळवळ निर्माण झाली पाहिजे, असेही ते म्हणाले. यावेळी आवश्यकतेनुसार कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याचे आदेशही त्यांनी दिले. शहरात प्रदूषण कमी करण्याबाबच्या उपाययोजनांची कठोर अंमलबजावणी सुरू झाली असली तरी पावसामुळे हवेची गुणवत्ता काहीशी सुधारल्याचे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. मात्र प्रदूषणात पुन्हा वाढ झाल्यास ट्रक तसेच अवजड वाहनांना बंदी, धूर सोडणाऱ्या वाहनांवर कारवाई, सम-विषम पद्धतीने वाहनांना रस्त्यावर आणण्याची परवानगी यासारख्या उपाययोजना आयआयटीच्या तज्ज्ञांनी सुचविल्या आहेत.
Mhada High Court : म्हाडानं पेशवाईप्रमाणे वागू नये, 24 तासांत ताबापत्र द्या; हायकोर्टाचा दणका |
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार मुंबई महापालिकेने कृत्रिम पाऊस पाडण्याबाबत चाचपणी सुरू केली आहे. दिल्लीमध्ये ‘क्लाऊड सिडिंग’ होणार असून त्याला यश आल्यास मुंबईतही त्याबाबत विचार केला जाईल, अशी माहिती चहल यांनी पत्रकार परिषदेत दिली. याखेरीज महापालिकेने अन्य उपाययोजना सुरू केल्या असून त्याचा एक भाग म्हणून बाहेरून शहरात येणाऱ्या वाहनांची चाके धुण्यासाठी शहराच्या सर्व प्रवेशद्वारांवर ‘वॉटर जेट स्प्रे मशीन’ बसवण्यात येणार असल्याचे चहल यांनी सांगितले. त्यासाठी गाड्या थांबवण्याची गरज भासणार नाही. चालत्या गाड्यांच्या चाकांवरच पाणी फवारले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे धूळ कमी करण्यासाठी दररोज ६५० किमी रस्ते धुण्यात येणार असून आगामी काळात १००० किमी रस्ते धुण्यासाठी नियोजन केले जाणार असल्याचे ते म्हणाले. कचरा जाळण्याच्या घटना घडू नयेत कचराभूमीवर सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आल्याचे चहल यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांच्या सूचना
रस्ते पाण्याने स्वच्छ करा. साचलेली धूळ साफ करण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती करा.
●रस्ते धुण्यासाठी टँकरची संख्या एक हजारपर्यंत वाढवा.
●विकासकामांच्या ठिकाणी धूळ रोखण्यासाठी पत्रे लावा.
●शहरातील सर्वाधिक प्रदूषण होणाऱ्या ठिकाणांवर नियंत्रण ठेवा.
●माती, राडारोडा झाकून वाहतूक होत नसेल तर कारवाई करा.
●महानगरांमध्ये नागरी वनक्षेत्र (मियावाकी) वाढविण्यासाठी पुढाकार घ्या.
●प्रदूषण नियंत्रण उपाययोजनांचा आढावा दर आठवड्याला सादर करा.
शहर
- Pune : कुठे आहेत ‘स्मार्ट’ प्रकल्प? स्मार्ट सिटी योजनेवर स्वयंसेवी संस्था आणि विरोधकांकडून प्रश्न
- Pune : सर्वांत महाग घरे लॉ कॉलेज रस्त्यावर, प्रतिचौरस फुटांसाठी १६ हजार ८१६ रुपये दर, कोरेगाव पार्कपेक्षा अधिक
- Mumbai : इगतपुरी-आमणे समृद्धी महामार्ग : लोकार्पणाआधीच महामार्गावरून अनधिकृतपणे वाहने धावू लागली
- Mumbai : मुंबईकरांवर कचरा शुल्काचा बोजा; १०० रुपये ते ७५०० रुपये आकारणार
महाराष्ट्र
- Ulhasnagar : खिडकीत बसलेली दोन मुले दुसऱ्या मजल्यावरून कोसळली; ग्रील तुटल्याने घडली घटना
- Santosh Deshmukh Case: धाराशिवच्या कळंबमध्ये कुजलेल्या अवस्थेत सापडला होता महिलेचा मृतदेह, बीड कनेक्शन आलं समोर
- Latur Crime : शिक्षकच बनला भक्षक! ३ महिन्यांपासून मुलांवर अनैसर्गिक अत्याचार
- Mumbai : निसर्ग उन्नत मार्गावर पर्यटकांची झुंबड, सर्व स्लॉट हाऊसफुल्ल
गुन्हा
- Mumbai Crime : खळबळजनक! मुंबईत ३८ दिवसांच्या बाळाची विक्री करण्यासाठी चोरी? पोलिसांनी असा उधळला चोरट्यांचा डाव
- Pune : शनिवार पेठेतून दुचाकी चोरणारा गजाआड, चोरट्याकडून दुचाकी चोरीसह घरफोडीचे गुन्हे उघड
- Pune Crime : टोळक्याकडून निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला मारहाण; तलवारी उगारुन घरातील साहित्याची तोडफोड
- Ghatkoper Crime : नकोशी! पाळण्याच्या दोरीनेच ४ महिन्याच्या लेकीचा बापाने जीव घेतला, घाटकोपर हादरलं
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- Kathua Encounter: जम्मू-कश्मीरमध्ये चकमक, 'जैश'च्या ५ दहशतवाद्यांचा खात्मा, ४ जवान शहीद
- Supreme Court : 'स्तन पकडणे बलात्कार नाही...', हायकोर्टाच्या या निर्णायावर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे
- CM Chandrababu Naidu : ‘तिरुपती मंदिरात फक्त हिंदूंनीच काम करावं’, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचं मोठं विधान
- Bill Gates : “भारत अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने विकसित होतोय”, बिल गेट्स यांच्याकडून कौतुक; म्हणाले, “नवनिर्मितीचं केंद्र…”