Mumbai : मुंबईला पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या धरणातून पावसाळ्यावेळी मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातो. विसर्ग केल्या जाणाऱ्या पाण्याचा पिण्याच्या पाण्यासाठी वापर करण्याचे नियोजन महापालिका करत आहे.
मध्य वैतरणा आणि मोडक सागरदरम्यान धरणालगतच बंधारा बांधण्याचा पर्याय विचाराधीन असून त्यासाठी लवकरच सल्लागाराची नियुक्ती केली जाणार आहे. दुसरीकडे, विहार तलावाजवळच उभारण्यात येणाऱ्या जादा क्षमतेच्या पम्पिंग स्टेशनच्या कामालादेखील गती दिली जाणार आहे. विहार तलावातून विसर्ग होणारे पाणी भांडुप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्रात वळवून ते पिण्यासाठी वापरण्यात येणार असून या कामाला याच महिन्यात सुरुवात होत आहे.
मुंबईला विहार, तुळशी, तानसा, मोडकसागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा आणि भातसा या जलस्रोतांतून पाणीपुरवठा केला जातो. हे जलस्रोत मुंबई शहरापासून सुमारे १०० किलोमीटर व त्यापेक्षाही लांब अंतरावर आहेत. सातही तलावांतून दररोज ३ हजार ९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. विहार तलावाची पाणीसाठवण क्षमता ही २७ हजार ६९८ दशलक्ष लिटर आहे. या तलावक्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यास धरणे तुडुंब भरतात. परिणामी त्यातून जादा पाण्याचा विसर्ग करावा लागतो. या पाण्याचाही पिण्यासाठी वापर करता येईल, अशी योजना पालिकेने तयार केली आहे.
Pune : पुणे स्टेशन परिसरातील दुकानाला आग, दुकानाच्या परिसरातील लॉजमधील प्रवाशांची सुखरुप सुटका |
विहार तलावाच्या काठावर २०० दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी) क्षमतेचे पम्पिंग स्टेशन बांधण्यात येत आहे. अतिरिक्त साठवलेल्या पाण्यामुळे पावसाळ्यात शहराच्या दैनंदिन पाणी पुरवठ्यात भर पडेल, अशी आशा महापालिकेला आहे. यासाठी ९८ कोटी रुपये खर्च आहे. विहार तलावातून बाहेर पडणारे अतिरिक्त पाणी पम्पिंग स्टेशनमध्ये वळवले जाईल, जे पुढे भांडुप संकुलातील जलशुद्धीकरण केंद्रात पाठवले जाणार आहे. त्यानंतर शुद्ध केलेले पाणी शहराच्या पाणीपुरवठ्यातून उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पास महिन्यापासून असल्याची चालू सुरुवात होत माहिती मुंबई महापालिकेचे सहायक अभियंता (पाणी पुरवठा प्रकल्प) सौरभ देशपांडे यांनी दिली.
हे पम्पिंग स्टेशन प्रतिदिन दोनशे दशलक्ष लिटर क्षमतेचे असले तरीही सुरुवातीला त्यात ९० दशलक्ष लिटर एवढ्याच क्षमतेचा पाणीसाठा केला जाणार असल्याचे, देशपांडे म्हणाले. या प्रकल्पाबरोबरच मोडकसागर आणि मध्य वैतरणातूनही विसर्ग होणाऱ्या पाण्याचा वापर मुंबईकरांसाठी केला जाणार आहे. या दोन धरणांदरम्यान लहानसा बंधारा बांधण्याची योजना आहे. यातून मुंबईकरांचा पाणीप्रश्न सोडवण्याचा प्रयत्न असणार आहे.
पावसाळ्यात विहार तलाव ओव्हरफ्लो झाल्यास ते पाणी मिठी नदीत सोडले जाते. त्यामुळे काही वेळा मिठी नदीच्या पाण्याची पातळी वाढते. परिणामी, त्याचा फटका आणूबाजूच्या परिसरांना बसतो. विहार तलावाजळील प्रकल्प झाल्यास विसर्ग पाणी मिठी नदीत सोडले जाणार नाही. त्यामुळे येथील स्थानिकांनाही दिलासा मिळेल.
मध्य वैतरणाची साठवणक्षमता अधिक
मुंबईला पाणीपुरवठा करणारी सात धरणे आहेत. त्यापैकी अप्पर वैतरणातून मध्य वैतरणाला पाणी मिळते आणि तेथून मोडकसागर धरणात पाणी जाते. मध्य वैतरणा आणि मोडकसागर दरम्यान बंधारा बांधण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. मोडकसागर धरणाची एकूण पाणीसाठवण क्षमता ही १ लाख २८ हजार ९२५ दशलक्ष लिटर, तर मध्य वैतरणाची पाणीसाठवण क्षमता १ लाख ९३ हजार ५३० दशलक्ष लिटर आहे.
शहर
- Gokhale Bridge : मुंबईकरांना खुशखबर, अंधेरीचा गोखले पूल झाला खुला, वाहतूककोंडी फुटणार
- Pune : भयावह! भरचौकात १८ वर्षाच्या तरूणीची हत्या, दुचाकीवर आले अन् सपासप वार केले
- Pune : भारतात राहून पाकिस्तानचा जयजयकार; पुण्याच्या तरूणीला ५ दिवसांची कोठडी
- Mumbai : मुंबई एअरपोर्टवर ड्रोनच्या घिरट्या, परिसरात भीतीचे वातावरण; पोलिसांकडून शोध सुरू
महाराष्ट्र
- 10th SSC Result : मोठी बातमी! दहावीच्या निकालाची तारीख आणि वेळ ठरली, बोर्डाकडून अधिकृत घोषणा
- Sangli : घराच्या मोकळ्या जागेवर गांजा लागवड; १० किलो गांजाची २३ झाडे जप्त
- Beed News : "शेतासाठी अडवलेले पाणी का घेतले?" जाब विचारताच शेतावर बाप लेकाच्या डोक्यात दगड घातला; बीडमध्ये खळबळ
- MHADA Home : ठाण्यात म्हाडाकडून बंपर लॉटरी! प्राइम लोकेशनवर ११७३ घरे; तर कल्याणामध्ये २,५०० घरांची विक्री
गुन्हा
- Crime News : दारूच्या नशेत चेष्टामस्करी; सहकारी दोन कामगारांची शस्त्राने वार करत हत्या
- Pune Crime : प्रेमाच्या जाळ्यात विवाहित महिलेला अडकवलं, नंतर वेश्याव्यवसायात ढकललं; पोलीस कर्मचाऱ्यानेही अब्रु लुटली
- Pune : समाज माध्यमातील ओळखीतून तरुणीवर बलात्कार; हडपसर पोलिसांकडून एकाविरुद्ध गुन्हा
- Pune : पाषाण भागात टोळक्याकडून वाहनांची तोडफोड- चौघांविरुद्ध गु्न्हा
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- Operation Sindoor : पाकिस्तानच्या गोळीबारात राजौरीचे अतिरिक्त जिल्हा आयुक्त राजकुमार थापा शहीद, दोन नागरिकांचाही मृत्यू
- India Pakistan Tensions : पाकिस्तानकडून ३६ ठिकाणं निशाण्यावर, ४०० ड्रोनने हल्ला, धार्मिक स्थळांना टार्गेट
- Pakistan : पाकिस्तानचे २ तुकडे होणार! बलुच नेत्याकडून संयुक्त राष्ट्रांकडे स्वतंत्र देश करण्याची मागणी
- India Pakistan War : आमचा काही संबंध नाही..., पाकिस्तानला अमेरिकेचा दणका, भारताला दिला पाठिंबा