Mumbai : राज्य परिवहन (एसटी) महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य न झाल्याने एसटी कामगार संयुक्त कृती समितीने मंगळवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. याचा थेट फटका राज्यभरातील एसटी प्रवाशांना बसला. गणेशोत्सवानिमित्त गावी जाणाऱ्या, ग्रामीण भागांत खरेदीसाठी बाहेर पडलेल्या प्रवाशांचे यामुळे प्रचंड हाल झाले. राज्यातील २५१ आगारांपैकी ५९ आगारे पूर्णत: बंद झाल्याने एसटीची सेवा विस्कळीत झाली.
‘ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी’ अशी ओळख असलेल्या एसटीची धाव कर्मचारी आंदोलनामुळे मंगळवारी प्रचंड मंदावली. ऐन गणेशोत्सवाच्या काळात आगारातून बस सुटत नसल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागले. अनेक भागांत वाडी-वस्त्यांना मुख्य शहराशी जोडणारी एसटीची सेवा ठप्प होती. सामान घेऊन गावी निघालेल्या कुटुंबांनाही खूप हाल सोसावे लागले. काही बस आगारांत कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवले. गणेशोत्सवासाठी गावी निघालेल्या अनेकांना आर्थिक भुर्दंड सहन करून खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला.
राज्यातील ११ कामगार संघटनांच्या कृती समितीने आंदोलन पुकारल्याने ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत २५१ आगारांपैकी ५९ आगार पूर्णत: बंद होते तर ७७ आगारांमध्ये अंशत: वाहतूक सुरू होती. ११५ आगारांमध्ये वाहतूक पूर्णत: सुरू होती. शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे सातव्या वेतन आयोगानुसार वेतन द्यावे, वेतन वाढीतील फरक दूर करावा, महागाई भत्त्याची थकबाकी द्यावी, मागील (पान १२ वर) (पान १ वरून) करारातील त्रुटी दूर कराव्यात, शिस्त व आवेदन पद्धतीमधील बदल करावा, वैद्याकीय कॅशलेस योजना लागू करावी आदी मागण्यांसाठी एसटी महामंडळातील बहुतांश संघटनांनी स्थापन केलेल्या ‘संयुक्त कृती समिती’ने हे आंदोलन पुकारले आहे.
Pimpri : पिंपरी पोलिसांनी तीन पिस्तुल आणि चार जिवंत काडतुसे केली जप्त; तडीपार गुंड जेरबंद |
मुख्यमंत्र्यांबरोबर आज बैठक
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर एसटी कामगार संघटनांची बैठक आज, बुधवारी सायंकाळी ७ वाजता होणार आहे. तत्पूर्वी मंगळवारी दुपारी उद्याोगमंत्री उदय सामंत यांनी समितीच्या शिष्टमंडळाबरोबर चर्चा केली. सरकार मागण्यांबाबत सकारात्मक असून सणासुदीच्या काळात आंदोलन करून प्रवाशांची गैरसोय करू नये, असे आवाहन सामंत यांनी केले. मात्र मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे घेण्यास संघटनेने नकार दिल्यामुळे बैठकीत तोडगा निघू शकला नाही. एसटी महामंडळानेही प्रवाशांची गैरसोय होईल, अशी कोणतीही कृती करू नये, असे आवाहन कर्मचाऱ्यांना केले आहे.
कुठे, कसा परिणाम?
मुंबई विभागात सर्व आगारातील वाहतूक सुरळीत होती. ठाणे विभागातील कल्याण, विठ्ठलवाडी आगार पूर्णत: बंद होती. विदर्भातील सर्व आगारातील वाहतूक सुरू होती. मराठवाड्यातील लातूर आणि नांदेड विभागात बहुतेक आगारे बंद होती.
पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर आणि सोलापूर विभागातील वाहतूक सुरळीत होती. पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर, वल्लभनगर, भोर, सासवड, बारामती, तळेगाव हे आगार पूर्णत: बंद होते. सांगली जिल्ह्यात मिरज, जत, पलूस या आगारांत शंभर टक्के बंद होता. तसेच सातारा जिल्ह्यातील कराड, वडूज, महाबळेश्वर ही आगारेदेखील बंद होती.
नाशिक जिल्ह्यातील नाशिक, पिंपळगाव, पेठ ही आगारे तर जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, चाळीसगाव येथे बंदला प्रतिसाद मिळाला. बाकीच्या ठिकाणी वाहतूक सुरळीत होती.
रत्नागिरी विभागातील खेड, दापोली ही बसस्थानके बंद होती. जिल्ह्यात गुहागर, चिपळूण आगारे अंशत: बंद आणि रत्नागिरी, लांजा, राजापूर, देवरुखमध्ये वाहतूक सुरळीत होती.
दृष्टिक्षेपात आंदोलन
● २२,३८९ नियोजित एसटी फेऱ्यांपैकी ११,९४३ फेऱ्या रद्द
● दिवसभरात ५० टक्के वाहतूक बंद
● एसटीचे अंदाजे १४-१५ कोटी रुपयांचे महसुली नुकसान
● ५९ आगारे पूर्णत: बंद
● ७७ आगारांमध्ये अंशत: वाहतूक
● ११५ आगारांमध्ये वाहतूक सुरळीत
सुमारे ६० ते ७० हजार कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत. मुख्यमंत्र्याबरोबर होणाऱ्या बैठकीत सकारात्मक निर्णय न झाल्यास आंदोलनाला अधिक व्यापक स्वरूप प्राप्त होईल.-
शहर
- Gokhale Bridge : मुंबईकरांना खुशखबर, अंधेरीचा गोखले पूल झाला खुला, वाहतूककोंडी फुटणार
- Pune : भयावह! भरचौकात १८ वर्षाच्या तरूणीची हत्या, दुचाकीवर आले अन् सपासप वार केले
- Pune : भारतात राहून पाकिस्तानचा जयजयकार; पुण्याच्या तरूणीला ५ दिवसांची कोठडी
- Mumbai : मुंबई एअरपोर्टवर ड्रोनच्या घिरट्या, परिसरात भीतीचे वातावरण; पोलिसांकडून शोध सुरू
महाराष्ट्र
- 10th SSC Result : मोठी बातमी! दहावीच्या निकालाची तारीख आणि वेळ ठरली, बोर्डाकडून अधिकृत घोषणा
- Sangli : घराच्या मोकळ्या जागेवर गांजा लागवड; १० किलो गांजाची २३ झाडे जप्त
- Beed News : "शेतासाठी अडवलेले पाणी का घेतले?" जाब विचारताच शेतावर बाप लेकाच्या डोक्यात दगड घातला; बीडमध्ये खळबळ
- MHADA Home : ठाण्यात म्हाडाकडून बंपर लॉटरी! प्राइम लोकेशनवर ११७३ घरे; तर कल्याणामध्ये २,५०० घरांची विक्री
गुन्हा
- Crime News : दारूच्या नशेत चेष्टामस्करी; सहकारी दोन कामगारांची शस्त्राने वार करत हत्या
- Pune Crime : प्रेमाच्या जाळ्यात विवाहित महिलेला अडकवलं, नंतर वेश्याव्यवसायात ढकललं; पोलीस कर्मचाऱ्यानेही अब्रु लुटली
- Pune : समाज माध्यमातील ओळखीतून तरुणीवर बलात्कार; हडपसर पोलिसांकडून एकाविरुद्ध गुन्हा
- Pune : पाषाण भागात टोळक्याकडून वाहनांची तोडफोड- चौघांविरुद्ध गु्न्हा
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Operation Sindoor : पाकिस्तानच्या गोळीबारात राजौरीचे अतिरिक्त जिल्हा आयुक्त राजकुमार थापा शहीद, दोन नागरिकांचाही मृत्यू
- India Pakistan Tensions : पाकिस्तानकडून ३६ ठिकाणं निशाण्यावर, ४०० ड्रोनने हल्ला, धार्मिक स्थळांना टार्गेट
- Pakistan : पाकिस्तानचे २ तुकडे होणार! बलुच नेत्याकडून संयुक्त राष्ट्रांकडे स्वतंत्र देश करण्याची मागणी
- India Pakistan War : आमचा काही संबंध नाही..., पाकिस्तानला अमेरिकेचा दणका, भारताला दिला पाठिंबा