Mumbai: सलग दोन पराभव, तसेच अजूनही गुणफलकात नावासमोर भोपळा असे हेलकावे खात असलेल्या मुंबई इंडियन्सचे अस्तित्व उद्या घरच्या मैदानावरच पणास लागणार आहे. एकीकडे हे आव्हान असताना आणि दुसरीकडे हार्दिक पंड्याविरुद्ध मुंबईकर प्रेक्षक हा सामना तेवढाच चर्चेचा विषय ठरणार आहे.
यंदाच्या आयपीएल स्पर्धेत मुंबईचा संघ उद्या वानखेडेवर म्हणजेच आपल्या घरच्या मैदानावर पहिला सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळणार आहे. स्पर्धेत नवी उभारी घेण्यासाठी मुंबईला विजय आवश्यकच आहे. सर्व खेळाडूंचा कस पणास लागेलच, पण कर्णधार हार्दिक पंड्यासाठी अस्तित्व पणास लागणारी परिस्थिती आहे.
खेळाडू म्हणून कामगिरी उंचावणे, कर्णधार म्हणून संघाला पहिला विजय मिळवून देणे यापेक्षा स्टेडियममधून होणाऱ्या विरोधाचा सामना करणे हे हार्दिकसाठी सर्वात आव्हानात्मक असू शकेल.
Sambhajinagar Corporation : छत्रपती संभाजीनगर मनपाची 182 कोटीची विक्रमी कर वसुली |
रोहित शर्माला बाजूला करून हार्दिकला मिळालेले मुंबई इंडियन्स संघाचे कर्णधारपद मुंबई संघाच्या पाठीराख्यांना पटलेले नाही. गुजरात संघातून दूर झाल्यामुळे गुजरात संघाचे पाठीराखे दुखावले आहेत. त्यामुळे अहमदाबादमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात हार्दिकला दोन्हीकडच्या पाठीराख्यांच्या रोषाचा सामना करावा लागला होता. हैदराबादमध्ये झालेल्या सामन्यातही तेथील प्रेक्षक रोहित...रोहित...असा नारा देत होते.
मुंबई संघटनेचे स्पष्टीकरण
मुंबईत उद्या होणाऱ्या सामन्यात हार्दिकला मोठ्या प्रमाणात विरोध होऊ शकतो. याची कल्पना मुंबई इंडियन्स संघालाही आहे. हार्दिकला विरोध करणाऱ्या घोषणा दिल्या किंवा शेरेबाजी केली तर त्यांना पकडण्यात येईल आणि त्यासाठी स्टेडियममध्ये अतिरित्त पोलिस तैनात करण्यात येतील, असे वृत्त प्रसिद्ध झाले होते; परंतु ही अफवा आहे.
यावर कोणी विश्वास ठेऊ नये, असे मुंबई क्रिकेट संघटनेने स्पष्ट केले. आयसीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसारच सुरक्षा असेल, असे सांगण्यात आले. त्यामुळे सामना एका बाजूला आणि हार्दिकला होत असलेला विरोध दुसऱ्या बाजूला असे चित्र उद्या वानखेडेवर असण्याची शक्यता आहे.
गोलंदाजीत बदल आवश्यक
मुंबई इंडियन्स संघात खरे तर नावाजलेले गोलंदाज आहेत; परंतु बुमराचा अपवाद वगळता इतर सर्वांनी साफ निराशा केली आहे. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात १८ वर्षीय दक्षिण आफ्रिकेचा युवक गोलंदाज क्वेना एमफाका याला संधी देण्यात आली, पण त्याची भलतीच धुलाई झाली होती. मात्र गत स्पर्धेत बुमरा नसतानाही धुरा सांभाळणाऱ्या आकाश मधवाल याचा विचार करण्यात आलेला नाही. हैदराबादविरुद्ध २७७ धावांची लूट झाल्यानंतर उद्या गोलंदाजीत बदल अपेक्षित आहेत.
दुसऱ्या बाजूला राजस्थान संघाने दोनही सामने जिंकलेले असल्यामुळे ते विजयाच्या हॅट्ट्रिकसाठी प्रयत्नशील असणारच. यशस्वी जयस्वाल घरच्या मैदानावर खेळणार आहे, तर रियान परागचा वेगळा अवतार सध्या पाहायला मिळत आहे. त्यामुळे मुंबईच्या गोलंदाजांना सावधच रहावे लागणार आहे.
बुमराद्वारे आक्रमण?
इतर संघांविरुद्ध अडखळणाऱ्या, परंतु मुंबईविरुद्ध २७७ धावांची विक्रमी धावसंख्या उभारणाऱ्या हैदराबाद संघाने कागदावर बलवान असलेल्या मुंबई गोलंदाजीच्या मर्यादा स्पष्ट केल्या. यात ज्याची क्रिकेट विश्वात धास्ती घेतली जाते त्या जसप्रित बुमराचे अस्त्र आपल्या भात्यात असताना त्याचा वापरच योग्य वेळी न करण्याच्या कर्णधार म्हणून हार्दिकच्या डावपेचांवर जोरदार टीका करण्यात आली आहे. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात पहिल्या १३ षटकांत बुमराला केवळ एकच षटक देण्यात आले होते. त्यामुळे उद्याच्या सामन्यात कोणत्याही परिस्थितीत बुमराद्वारे आक्रमण सुरू केले जाण्याची शक्यता आहे.
शहर
- Kalyan News : कल्याण डोंबिवलीत पार्किंग ठरतेय डोकेदुखी, दरवर्षी शहरात लाखो वाहनांची भर, केडीएमसीचे वाहनतळे अपुरे
- Kalyan News : रेल्वे स्टेशनजवळ पंचनाम्यासाठी गेले, API घटनास्थळी पोहोचताच नको ते घडलं; लोकलच्या धडकेनं...
- Pune : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा भव्य सोहळा
- Pune : गजा मारणेच्या टोळीची दादागिरी, तरूणाला रस्त्यात लाथा बुक्क्यांनी अन् पट्ट्याने बेदम मारहाण
महाराष्ट्र
- Ambernath : अंबरनाथ पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे शहरात कचऱ्याचे ढीग, सफाई कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन
- MSRTC ST Bus Attack : बस चालकाला मारहाण प्रकरण; महाराष्ट्र-कर्नाटक एसटी बस वाहतूक थांबवली,मारहाण प्रकरणानंतर ठाकरे गट आक्रमक
- Kalyan News : कल्याण डोंबिवलीत पार्किंग ठरतेय डोकेदुखी, दरवर्षी शहरात लाखो वाहनांची भर, केडीएमसीचे वाहनतळे अपुरे
- Dombivli : बोर्डाच्या पेपरपूर्वीच काळाचा घाला, डोंबिवलीतल्या विद्यार्थिनीचा मृत्यू, रेल्वेट्रॅकजवळ मृतदेह; आई-बापाचा मन हेलावणारा आकांत
गुन्हा
- Pune Crime : वाहतूक पोलिसावर दगडाने हल्ला करणारा गजाआड; ज्या चौकात हा प्रकार घडला त्याच चौकात त्याची पोलिसांनी काढली धिंड
- Pune Crime : घरी कुणी नसताना टोकाचं पाऊल, पुण्यात पोलिस कर्मचाऱ्याच्या मुलाने आयुष्याची दोर कापली
- Pune Crime : पुण्यात NDA हद्दीजवळ पाकिस्तानी चलनातील नोट सापडल्याने खळबळ
- Koyta Gang : कोथरुड मध्ये कोयता गॅंगची दहशत; भर रस्त्यावर दुचाकी चालकावर हल्ला, एक जण गंभीर जखमी
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- CBSE New Rule : दहावीची परीक्षा वर्षातून दोनदा? सीबीएसई नवा नियम लागू करण्याच्या तयारीत
- Mahakumbh Mela 2025 : महाकुंभातील चेंगराचेंगरीत बेपत्ता झाला अन् तेराव्यालाच प्रकटला, म्हणाला, 'साधूंबरोबर चिल्लम मारत होतो..'
- Delhi Railway Station Stampede: दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत जाहीर
- New Delhi Railway Station Stampede : १८ जणांच्या मृत्यूला रेल्वे जबाबदार, दिल्ली स्टेशनवरच्या चेंगराचेंगरीचं कारण समोर