Manoj jarange Patil : 'अजित पवारांनी ज्ञानाचा ग्रंथ लिहावा; पण मराठा आरक्षणाविरोधात बोलू नये...' जरांगे पाटलांचा इशारा

Manoj jarange Patil : 'मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी २० जानेवारीला मुंबईत येणारच अशी भूमिका घेतलेली आहे. जरांगे पाटील यांच्या या निर्णयावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टीका केली होती. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न कुणी केला, तर त्याचा मुलाहिजा ठेवायचा नाही. कायद्यापेक्षा कुणीही श्रेष्ठ नाही, असा टोला अजित पवार यांनी लगावला होता. त्यांच्या या टीकेला आता मनोज जरांगे पाटील यांनी उत्तर दिले आहे.

काय म्हणालेत जरांगे पाटील?

"अजित पवार यापुढे मराठा आरक्षणाच्या  विरोधात बोलले तर त्यांचा वेगळा विषय हाती घ्यावा लागेल. तुम्ही तुमच्या ज्ञानाचा ग्रंथ लिहा, पण मराठा आरक्षणाबाबत बोलायचं नाही," असा इशारा जरांगे पाटलांनी अजित पवारांना दिला आहे. आज अंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हा इशारा दिला आहे.

Parbhani Fire News : परभणीत आग्नितांडव: कपड्याच्या कारखान्यात भीषण आग, घरांनाही बसली झळ

लोकांचा वाढता पाठिंबा...

तसेच "पहिल्यापेक्षा या दौऱ्यात लोकांचा पाठिंबा वाढला आहे. जास्त दिवस झाल्यानंतर आंदोलनाची धार कमी होते, पण या दौऱ्यात लोकांचा पाठिंबा वाढलेला दिसून आला. असेही जरांगे पाटील  म्हणालेत. मोर्चात आमच्या वाढलेल्या संख्येमुळे सर्वांना आरक्षण मिळणार आहे," असेही त्यांनी नमूद केले.

ओबीसी नेत्यांवर टीका..

दरम्यान, "अंतरवालीपासून मोर्चात मराठा बांधवांची संख्या कमी असेल पण पुण्यापासून वाढेल. प्रशासन मोर्चात सहभागी होणाऱ्या लोकांचा आकडा काढत आहे, पण त्यांचाही आकडा चुकेल असा दावाही त्यांनी केला. आमच्या मुंबई मोर्चाला ओबीसी समाज नाही तर ओबीसी नेते आडवे येत आहे," असे म्हणत ही त्यांची जुनीच सवय असल्याचा टोलाही जरांगे पाटील यांनी लगावला.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *