Maharashtra Weather Upadte : राज्यभरातील अनेक शहरांच्या किमान तापमानात घट झाली आहे. गेल्या दोन, तीन दिवसांपासून राज्यभरात थंडीचा जोर वाढला आहे. पुण्यात थंडी वाढली आहे. पुण्यात पारा ८.७ अंशावर गेला आहे. गुरुवारी २८ नोव्हेंबर रोजी राज्यातील सरासरी किमान तापमान ११ ते १२ अंशांवर खाली आल्याने अवघा महाराष्ट्र गारठला. पुणे शहरातील एनडीए भागाचे तापमान ८.७ अंश सेल्सिअस इतके सर्वांत निच्चांकी ठरले. त्या पाठोपाठ अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, नागपूर, गोंदिया या ठिकाणचा पारा १० ते ११ अंशांवर खाली आला.
दरम्यान, आज म्हणजेच शुक्रवारी 29 नोव्हेंबर रोजी बंगालच्या उपसागरात फेंगल या चक्रीवादळाची निर्मिती होत आहे. त्यामुळे देशात दाट धुके वाढण्याची शक्यता आहे. खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) भागातील किमान तापमान ८.७ अंशांवर खाली आल्याने गुरुवारी ते राज्यात निच्चांकी ठरले. अहिल्यानगरचाही पारा ९.८ अंशांवर खाली आल्याने नगर जिल्हा गारठला आहे.
गुरुवारी राज्याचे सरासरी किमान तापमान 11 ते 12 अंशांवर खाली आल्याने अवघ्या राज्याला हुडहुडी भरली. शुक्रवारी बंगालच्या उपसागरात फेंगल नावाचे चक्रीवादळ तयार होत असल्याने वातावरणात आणखी बदल होऊन दाट धुके अन् थंडीची तीव्र 1 डिसेंबरपर्यंत वाढणार आहे.
Sawantwadi : मालवण समुद्रात भारतातील पहिली समुद्रतळ स्वच्छता मोहीम |
तसेच कोकणचे मिनी महाबळेश्वर अशी ओळख असलेल्या दापोलीत थंडीची लाट उसळली असून कमाल व किमान तापमानात सतत चढ उतार जाणवत आहे. थंड हवेचे ठिकाण अशी ओळख असलेल्या दापोलीमध्ये अचानक कडाक्याची थंडी पसरल्याने नागरिकांनी या थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोटीचा आधार घेतला जात आहे , तर काही लोकांनी उबदार कपडे बाहेर काढले आहेत. गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी पर्यटक दापोली देणे पसंत करत आहेत, तर दुसरीकडे नागरिकांनी व्यायामावर भर दिला आहे.
जळगाव जिल्ह्याचे रात्रीचे तापमान घसरलं
जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा घसरला असून किमान तापमान १३ अंशांवर गेले आहे. नोव्हेंबर महिना संपत आला तरी थंडीचा मागमूस नव्हता. मात्र दोन दिवसांपासून किमान तापमान घसरू लागले आहे. आठवड्यात थंडीची लाट आणखी वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. जळगाव जिल्ह्याचे दिवसाचे तापमान ३० अंशांवर आहे, तर रात्रीचे तापमान ११ अंशांवर आले आहे. त्यामुळे रात्रीचा पारा कमालीचा कमी झाल्याने लहान बाळांना गरम कपड्यासह त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
याचदरम्यान, भंडाऱ्यातील शेतकऱ्यांना चिंता लागली आहे. गत काही दिवसांपासून धुके आणि ढगाळ वातावरणामुळे तूर पिकाला फटका बसत आहे. त्यामुळे पिकाची फूल गळती होत असून, उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सततच्या नापिकीमुळे त्रासलेल्या शेतकऱ्यांवर नेहमीच संकटाची टांगती तलवार आहे. वातावरणातील बदल सर्वात आधी तुरीच्या पिकावर जाणवतो. ढगाळ वातावरणामुळे पिकाचा फुलोरा गळत चालला असून, याचा मोठा फटका तुर उत्पादकांना बसणार आहे. त्यामुळे पीक पुन्हा हातून जाण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर नैराश्य आहे.
शहर
- Pune : दुकानातून फक्त अंतर्वस्त्र चोरायचा, पुणे पोलिसांनी मुसक्या आवळल्या, ७ लाखांचे कपडे हस्तगत
- Deenanath Hospital : १० लाख स्वतःसाठी मागितले नव्हते; डॉ.सुश्रुत घैसासवर दाखल झालेला गुन्हा चुकीचा: IMA
- Pune : बांधकामांच्या पर्यावरण मंजुरीचा तिढा सोडविणार, ‘क्रेडाई’च्या वतीने आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही
- Shocking News: झिपलायनिंग करणं जीवावर बेतलं, ३० फूट उंचीवरून पडून तरुणीचा मृत्यू
महाराष्ट्र
- Washim Water Scarcity : पाण्याचे भीषण संकट, प्रशासनाकडून गावाला ट्रॅकरही मिळेना; डोक्यावर हंडा घेऊन महिलांची जिल्हा परिषदेवर धडक
- Ajit Pawar: रिक्षात पुरुषाला बसवलं तर आधी फोटो काढा; अजितदादांचा बहिणांना मोलाचा सल्ला
- Ashwini Bidre Case : मोठी बातमी! अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणातील आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप
- RTE Admission : शिक्षण हक्क कायद्याचा गैरवापर; रायगड जिल्ह्यात पालकांनी जोडले बोगस पुरावे
गुन्हा
- Pune : दुकानातून फक्त अंतर्वस्त्र चोरायचा, पुणे पोलिसांनी मुसक्या आवळल्या, ७ लाखांचे कपडे हस्तगत
- Pune : लोणी काळभोर भागात अफुची लागवड, पोलिसांचा छापा; महिला गजाआड
- Mumbai Crime : खळबळजनक! मुंबईत ३८ दिवसांच्या बाळाची विक्री करण्यासाठी चोरी? पोलिसांनी असा उधळला चोरट्यांचा डाव
- Pune : शनिवार पेठेतून दुचाकी चोरणारा गजाआड, चोरट्याकडून दुचाकी चोरीसह घरफोडीचे गुन्हे उघड
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- 250 Passengers Stranded in Turkey : लंडनहून मुंबईला येणाऱ्या विमानाचं तुर्कीत लँडिंग, ४० तासांहून अधिक काळापासून २५० प्रवासी पडले अडकून
- Waqf Amendment Bill : वक्फ विधेयकात कोणत्या सुधारणा केलेल्या आहेत? त्यावरून वाद का निर्माण झाला?
- Kathua Encounter: जम्मू-कश्मीरमध्ये चकमक, 'जैश'च्या ५ दहशतवाद्यांचा खात्मा, ४ जवान शहीद
- Supreme Court : 'स्तन पकडणे बलात्कार नाही...', हायकोर्टाच्या या निर्णायावर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे