Maharashtra Weather : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले. सध्या राज्यात ऊन पावसाचा खेळ सुरू आहे. काही जिल्ह्यांमध्ये कडाक्याचे ऊन तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी उकाडा सुरू झाला आहे. राज्यात पुन्हा सूर्य आग ओकू लागला आहे. उन्हाच्या चटक्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. राज्यात अकोला येथे सर्वात उच्चांकी ४४.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज राज्यावर पुन्हा अवकाळीचे संकट आहे. विदर्भात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
नाशिकमध्ये ४ दिवसांच्या उच्चांकी तापमानानंतर आजपासून पारा कमी होणार आहे. आयएमडीच्या वेबसाईटवर ही माहिती देण्यात आली आहे. गेले ५ दिवस नाशिकमध्ये उन्हाचा सर्वाधिक चटका जाणवला. आजपासून उष्णतेचा पारा कमी होणार आहे. सर्वाधिक ४१.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाला. आता दररोज एक अंशाने तापमानाचा पारा घसरण्याचा अंदाज आहे. तरीही नागरिकांनी दुपारच्या वेळेला काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरातील तापमानात सलग दुसऱ्या दिवशीही वाढ झाली आहे. यंदा एप्रिलमध्ये प्रथमच पारा चाळीशी पार गेला असून बुधवारी चिपळूण मधील कमाल तापमान ४०.३ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. उन्हाच्या कडाक्यामुळे दुपारी नागरिकांना घराबाहेर जाणे टाळले त्यामुळे शहरातील रस्त्यांवर गर्दी कमी होती. कोकण कृषी विद्यापीठाकडून आलेल्या अंदाजानुसार कोकण विभागात १३ ते १९ एप्रिल दरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तापमानात वाढ होत असल्याने चिपळूण शहरात पाणी टंचाईमध्ये वाढ होत असून टँकरची मागणी देखील वाढलेली आहे.
छत्रपती संभाजी नगर शहरात सूर्य आग ओळखत असल्याची प्रचिती पुन्हा आलेली आहे. बुधवारी दुपारी ४२.६ अंश सेल्सिअस इतक्या सर्वाधिक तापमानाची नोंद झालेली आहे. दररोज तापमानात एक अंशाने वाढ होत असल्यामुळे उन्हाळ्यात तापमानाचा पारा पन्नाशी गाठतो की काय अशी भीती वाटू लागली आहे. आज सकाळपासून ही तीच स्थिती आहे. छत्रपती संभाजीनगरात मागील पाच दिवसांपासून शहर आणि परिसरावर सूर्य आग ओकत आहे. चिकलठाणा वेधशाळेने काल कमाल तापमान ४२.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यंदाच्या उन्हाळ्यातील हे सर्वोच्च तापमान आहे. दरवर्षी एप्रिल अखेर आणि वैशाखाच्या सुरुवाती पूर्वी एवढे तापमान असते. तो आकडा एप्रिलच्या पहिल्या १० दिवसांतच गाठल्याने पुढील काळात तापमान अजून वाढणार असल्याने संभाजीनगरकरांची चिंता वाढली आहे.
सध्या नांदेड शहरातील तापमान ४१ अंशांच्या पुढे जाऊ लागले असून, उष्णता वाढली आहे. दुपारच्या वेळेत शहरातील मुख्य रस्ते ओस पडत आहेत. तापमान वाढल्याने शीतपेयांना मागणी वाढली आहे. वाढत्या उन्हात आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. उन्हाळा सुरू झाला असून तापमानात वाढ होत आहे. मध्यंतरी जिल्ह्यात सर्वत्रच पावसाने हजेरी लावल्यानंतर काही प्रमाणात कमी झालेला तापमानाचा पारा दोन दिवसांपासून पुन्हा एकदा वाढू लागला असून, तो आता ४२ अंशांवर पोचला आहे. दुपारची मेहनतीची कामे टाळावीत. अनावश्यक घराबाहेर पडू नये. दुपारी ज्या मुलांची शाळा असेल, त्यांची पालकांनी काळजी घ्यावी, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
शहर
- Mumbai : मुंबई एअरपोर्टवर ड्रोनच्या घिरट्या, परिसरात भीतीचे वातावरण; पोलिसांकडून शोध सुरू
- Mumbai Local : ट्रान्स हार्बरची वाहतूक ठप्प, तुर्भे स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड; प्रवाशांचे प्रचंड हाल
- Mumbai Local : मुंबईत वरुणराजा अवकाळी बरसला, रस्त्यावर पाणी, लोकलचा खोळंबा; चाकरमान्यांचा वेट अँड वॉच
- Pune Crime : माझ्या आईला पप्पांनीच मारलं; राकेशनं बबीताला का मारलं? पुण्यातील दुचाकीवरील मृतदेहाचं गूढ उलगडलं
महाराष्ट्र
- Pakistan : 'काही पण होऊ द्या पाठिंबा फक्त...', तरुणाला पाकिस्तानचा पुळका, पोलिसांनी शिकवला धडा
- Dharashiv : पैशांची देवाण- घेवाण करून जनतेची कामे; व्हायरल व्हिडीओने खळबळ
- Beed : अंबाजोगाईच्या योगेश्वरी देवी मंदिर ट्रस्टची 'ती' घटना रद्द; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
- Yavatmal : लग्न ठरलं, साखरपुडा झाला अन् अचानक मोडलं; इंजिनिअर तरूणीनं घरातच आयुष्य संपवलं, यवतमाळमध्ये खळबळ
गुन्हा
- Crime News : दारूच्या नशेत चेष्टामस्करी; सहकारी दोन कामगारांची शस्त्राने वार करत हत्या
- Pune Crime : प्रेमाच्या जाळ्यात विवाहित महिलेला अडकवलं, नंतर वेश्याव्यवसायात ढकललं; पोलीस कर्मचाऱ्यानेही अब्रु लुटली
- Pune : समाज माध्यमातील ओळखीतून तरुणीवर बलात्कार; हडपसर पोलिसांकडून एकाविरुद्ध गुन्हा
- Pune : पाषाण भागात टोळक्याकडून वाहनांची तोडफोड- चौघांविरुद्ध गु्न्हा
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Operation Sindoor : पाकिस्तानच्या गोळीबारात राजौरीचे अतिरिक्त जिल्हा आयुक्त राजकुमार थापा शहीद, दोन नागरिकांचाही मृत्यू
- India Pakistan Tensions : पाकिस्तानकडून ३६ ठिकाणं निशाण्यावर, ४०० ड्रोनने हल्ला, धार्मिक स्थळांना टार्गेट
- Pakistan : पाकिस्तानचे २ तुकडे होणार! बलुच नेत्याकडून संयुक्त राष्ट्रांकडे स्वतंत्र देश करण्याची मागणी
- India Pakistan War : आमचा काही संबंध नाही..., पाकिस्तानला अमेरिकेचा दणका, भारताला दिला पाठिंबा