Maharashtra News LIVE : लाडक्या बहि‍णींसाठी आनंदवार्ता, लवकरच जानेवारीचा हप्ता

  • 20 Feb 2026 08:30 AM (IST)

    बनावट जन्म दाखल्याप्रकरणी पहिला गुन्हा दाखल

    बनावट जन्म दाखल्याप्रकरणी नाशिकमध्ये पहिला गुन्हा दाखल करण्यात आला. नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. खोटे जात प्रमाणपत्र तयार करून ते खरे असल्याचे दाखवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणात कारवाई करण्यात आली. जन्म प्रमाणपत्राची प्रत मनपाच्या कार्यालयात ऑनलाइन प्रणालीत प्रमाणपत्रावरील नोंदणी क्रमांक तपासला असता हे प्रमाणपत्र खोटे असल्याचे निदर्शनास आले. संशयित शेख नायजा नूर महंमद या महिलेने बनावट व खोटे जन्म प्रमाणपत्र तयार करून ते खरे असल्याचे दाखवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी सातपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

  • 20 Feb 2026 08:20 AM (IST)

    अधिकाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न

    अन्न व औषध प्रशासनाच्या छापा टाकण्यास गेलेल्या अन्न व औषध अधिकारी रेणुका पाटील या महिला अधिकार्याच्या अंगावर गाडी घालून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न सोलापूर जिल्ह्यात घडला.माढ्याच्या बावी गावामधील धक्कादायक घटना घडली. गुटख्याचा साठा असलेल्या तिन पिकअप पैकी दोन पिक अप गुटख्यासह ताब्यात घेतले असून एक पिकअप पसार झालाय. माढा पोलिसांत जीवे मारण्याच्या प्रयत्नासह सरकारी कामात अडथळा आणल्याचा ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 20 Feb 2026 08:10 AM (IST)

    दहावीची पहिली परीक्षा सक्तीची; न दिल्यास दुसरी संधी नाही

    Central Board of Secondary Education (CBSE) ने दहावीची परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याचा निर्णय घेतला असला तरी पहिली परीक्षा देणे सक्तीचे केले आहे. पहिल्या परीक्षेला गैरहजर राहिलेल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या परीक्षेला बसता येणार नाही. किमान तीन विषय न दिल्यास विद्यार्थ्यांना ‘एसेंशियल रिपीट’ श्रेणीत ठेवून पुढील वर्षी मुख्य परीक्षेला बसावे लागेल. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना तीन विषयांपर्यंत गुण सुधारण्याची संधी असेल.नियमात कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचे बोर्डाने स्पष्ट केले आहे.

  • 20 Feb 2026 08:02 AM (IST)

    आजपासून दहावीच्या परीक्षेचा श्रीगणेशा

    महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या वतीने दहावी परीक्षेदरम्यान गैरप्रकार रोखण्यासाठी २७१ भरारी व बैठी पथके तैनात करण्यात आली आहेत. राज्यातील १९१ परीक्षा केंद्रे संवेदनशील असून, त्यापैकी ४२ ठिकाणी सीसीटीव्ही नसल्याने शिक्षक-कर्मचाऱ्यांची अदलाबदल होणार आहे. ५५४ केंद्रांवर अद्याप कॅमेरे बसविलेले नाहीत. मागील वर्षी ३१ केंद्रांची मान्यता रद्द करण्यात आली होती.परीक्षा केंद्रापासून ५०० मीटर परिसरातील झेरॉक्स केंद्रे बंद ठेवण्याचे आदेश आहेत. राज्यात ९,७८८ दिव्यांग विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. पुण्यातील दोन विद्यार्थ्यांना लॅपटॉप वापराची मुभा देण्यात आली आहे.



  • राजकीय

    मनोरंजन

    विडियो गॅलेरी

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *