Mumbai : फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; मच्छीमारांना मिळणार वीज सवलत, फक्त ठेवली महत्वाची अट

Mumbai : फडणवीस सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. आता शेतकऱ्यांप्रमाणे मच्छिमारांनाही वीज सवलत मिळणार आहे. मंत्री नितेश राणे यांच्या मागणीनुसार शासनाकडून निर्णय जारी करण्यात आला आहे. मत्स व्यवसायाला कृषी दर्जा मिळाल्यामुळे वीज सवलत लागू झाली आहे.

महाराष्ट्र सरकारने मच्छिमारांना वीज सवलत लागू करून त्यांची दिवाळी गोड केली आहे. सरकारच्या निर्णयानुसार मच्छीमार, मत्स्य संवर्धक,मत्स्य व्यावसायिक, मत्स्यकास्तकार यांना ही सवलत लागू होईल. सवलतीचा लाभ घेण्यासाठी प्रकल्पाची एनएफडीबी अंतर्गत नोंदणी आवश्यक आहे. त्यामुळे वीज सवलतीचा लाभ मिळवण्यासाठी मच्छिमारांना तातडीने नोंदणी करावी लागणार आहे.

Kurnool Bus Fire : आंध्र प्रदेशात भीषण दुर्घटना; ४० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसला आग, २० जणांचा मृत्यू

सरकारची वीज सवलत ही मच्छिमार,मत्स्यकास्तकार मत्स्यउत्पादक, मत्स्यव्यवस्थापन, मत्स्यबीज संवर्धक, मत्स्यबोटुकली संवर्धन करणारे घटक, Post Harvesting यामध्ये वर्गीकरण, प्रतवारी, आवेष्ठन, साठवणूक करणाऱ्या घटकांना ही वीज सवलत मिळेल. या घटकांना कृषी दराप्रमाणे वीजदरात सवलत लागू करण्याची बाब सरकारच्या विचाराधीन होती.

योजनेच्या लाभासाठी अटी आणि शर्ती काय?

वीजदरात सवलत लाभार्थ्याने स्वसत्यापन (Self- Attestation) मिळण्यासाठी सहाय्यक आयुक्त (मत्स्यव्यवसाय) संबंधित जिल्हास्तर यांच्याकडे अर्ज सादर करावा लागेल.

मत्स्यव्यवसाय प्रकल्प NFDB अंतर्गत नोंदणीकृत असणे गरेजेचे असणार आहे.
अवसायनात गेलेले प्रकल्प या वीज सवलतीस पात्र ठरणार नाहीत.

सदर योजनेत सवलतीने मिळणाऱ्या वीजेचा गैरवापर झाल्याचे निदर्शनास आल्यास यापूर्वी दिलेल्या सवलतीची रक्कम दंडनीय व्याजासह वसूल करण्यात येईल, असे सरकारने स्प्टष्ट केलेय. यासाठी हमीपत्र संबंधित मत्स्यव्यवसाय विभागाने सादर करणे बंधनकारक राहील.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *