Maharashtra Election : ५० वर्षात राहुल गांधींचं लॉन्चिंग झालं नाही; मुख्यमंत्री शिंदेंची टीका

Maharashtra Election : राहुल गांधींना थोडी गर्मी झाली की ते परदेशात जातात. राहुल गांधींनी स्वप्नात विचार केला तरी ते पंतप्रधान होऊ शकत नाहीत, फक्त मोदीच पंतप्रधान होऊ शकतात. गेल्या ५० वर्षात राहुल गांधींचे लॉन्चिंग होऊ शकलं नसल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलीय. डॉ. सुजय विखे यांच्या समर्थनार्थ घेण्यात आलेल्या प्रचार सभेत मुख्यमंत्री बोलत होते.

राज्यातील (अहमदनगर) पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर नगरमधील निवडणुकीकडे अख्या देशाचं लक्ष लागलं आहे. महायुतीकडून सुजय विखे पाटील यांना उमेदवारी दिलीय आज डॉ. सुजय विखे-पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. यावेळी विखेंच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'इंडिया' आघाडी आणि राहुल गाधींवर हल्लाबोल चढवला.

Pune Crime : खरेदी करण्यासाठी आला अन् सोन्याची चैन घेवून झाला फरार; पुण्याच्या वाघोलीतील घटना

मोदींच्या नखाची सर इंडिया आघाडीला येणार नसणार असल्याची टीका शिंदेंनी केलीय. त्यानंतर राहुल गांधींवर घाणघात करताना शिंदे म्हणाले राहुल गाधींनी स्वप्नात जरी विचार केला तरी ते पंतप्रधान होणार नाहीत. त्यांनी गर्मी झालं की ते लगेच परदेशात निघून जातात. गेल्या ५० वर्षात त्यांचे लॉन्चिंग झालं नसल्याची टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी केलीय.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply