Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यात बॉम्ब असल्याच्या फोनने खळबळ, ठाणे पोलिसांची पळापळ

Jitendra Awhad : राजकीय नेत्यांना जीवे मारण्याच्या धमक्या, त्यांच्या निवासस्थानी बॉम्ब असल्याचे फोन सध्या येत आहेत. राज्याचे माजी गृहनिर्माण मंत्री अणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील नाद या बंगल्यात रात्री बॉम्ब असल्याच्या एक निनावी फोन काल आला होता. त्यामुळं रात्री खळबळ उडाली होती.

हा फोन आल्यानंतर बॉम्बशोधक विभागाने तपासणी केली. पण, तपासात काहीही निष्पन्न झालं नाही. दोन दिवसांपूर्वी मुंबईमध्ये आव्हाड यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता होती, अश्या प्रकारे त्यांनी ट्विट देखील केलं होतं. या फोनमुळे ठाणे पोलिसांची चांगलीच पळापळ झाली होती.

Ramdas Athawale : उद्धव ठाकरे आघाडीला कंटाळून परत येतील; रामदास आठवलेंनी व्यक्त केला विश्वास

जितेंद्र आव्हाड यांचं ट्विट

दोन दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड  यांनी एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये दिसत असलेला माणूस आणि त्याच्यासोबत असलेला आणखी एक गृहस्थ व्हिडिओ कॉलवर कुणाशी तरी बोलत होते. मला मारण्यासंदर्भात त्यांच्यात चर्चा सुरू होती. ती एका पत्रकाराने ऐकली अन् माझ्यासोबत असणाऱ्या पोलीस आणि मुलांना सांगून सावध केलं.

मात्र, तेवढ्यात तो हातून निसटून हॉटेल ट्रायडंटमध्ये १९ व्या मजल्यावर कुठे तरी गेला. ही बाब नंतर माझ्या कानावर घालण्यात आली. माझ्यासोबत असलेल्या मुलांनी त्याचा पाठलागही करण्याचा प्रयत्न केला. पण, तो त्यांच्या हाती लागला नाही, असं  जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं होतं.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply