Ind vs Pak: शेवटच्या दोन ओव्हर पाहण्यासाठी उड्डाण पाच मिनिटांनी लांबवलं? विमान मुंबई एअरपोर्टच्या रनवेवर धावत असतानाच…

मागील काही वर्षांमधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामना इतका रंजक आणि रोमांचक कधीच झाला नसेल अशा प्रतिक्रिया टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये रविवारी झालेल्या सामन्यानंतर व्यक्त केल्या जात आहेत. अगदी शेवटच्या क्षणी निर्णय लागलेल्या या सामन्यामध्ये दोन्ही संघांनी मिळून ३०० हून अधिक धावा केल्या. मात्र या सामन्याचा खरा हिरो ठरला तो विराट कोहली. कोहलीने ५३ चेंडूंत सहा चौकार आणि चार षटकारांच्या साहाय्याने नाबाद ८२ धावांची खेळी करताना भारताचा विजय साकारला. या विजयानंतर सोशल मीडियावरुन विराटवर आणि भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होत असतानाच या सामन्यातील शेवटची दोन निर्णायक षटकं पाहण्यासाठी एका विमानाचं उड्डाण पाच मिनिटं उशीराने झालं असं तुम्हाला सांगितलं तर नक्कीच आश्चर्य वाटेल ना? पण असं मुंबई विमानतळावर खरोखरच घडल्याचा प्रसंग एका अभिनेत्यानेच सांगितलं आहे.

भारताच्या विजयानंतर काही तासांनी अभिनेता अयुष्मान खुरानाने ट्वीटरवर तीन ट्वीट केले. या ट्वीटमध्ये त्याने सामन्यातील शेवटच्या दोन षटकं पाहता यावी म्हणून विमानचं उड्डाण पाच मिनिटं उशीराने झाल्याचं म्हटलं आहे. “ही गोष्ट माझ्या पुढल्या पिढ्यांना मला सांगता येईल. मी भारत पाकिस्तान सामन्यातील शेवटची दोन षटकं मुंबई-चंदीगढ विमानामध्ये पाहिली. विमानाचे उड्डाण होण्याच्या काही मिनिटं आधी इतर प्रवाशीही त्यांच्या स्मार्टफोनला चिटकून असताना मी ही अशाच पद्धतीने शेवटची दोन षटकं पाहिली. मला विश्वास आहे की क्रिकेटचा चाहता असलेल्या वैमानिकाने मुद्दाम पाच मिनिटं उशीर केला. आणि विशेष म्हणजे कोणीही याबद्दल तक्रार केली नाही,” असं आयुष्मानने म्हटलं आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *