पुण्यातील भाजप खासदार आणि ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले. गिरीष बापट गंभीर आजाराने त्रस्त होते.गेल्या दीड वर्षांपासून ते आजारी होते. बापटांच्या निधनाची बातमी भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिली. त्याचं पार्थिव शनिवार पेठेतील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. अंत्यदर्शनासाठी सर्व राजकीय पक्षातील जेष्ठ नेते, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
बापटांच्या अंत्यदर्शनासाठी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. सर्वसमावेशक नेता आणि भाऊ अशी त्यांची ओळख होती आणि पुण्यात त्यांचा जनसंपर्कही दांडगा होता. त्यांनी अनेक नेते घडविले, ते नगरसेवक, आमदार, खासदार मंत्री झाले तरी देखील सामान्यांशी असलेली नाळ त्यांनी कधीच तोडली नाही.
अखेर आज त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत विद्युत दाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राज्यातील भाजपचे दिग्गज नेते हजर होते. हजारो कार्यकर्ते पाणावलेल्या डोळ्यांनी 'गिरीश बापट अमर रहे', अशा घोषणा देत होते. गिरीश बापट यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि सून आणि नात असा परिवार आहे.
गिरीश बापटांच्या निधनावर 'या' नेत्यांनी व्यक्त केल्या भावना
एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री- खासदार गिरीश बापट यांची एक दिलदार, कणखर आणि मोकळ्या मनाचा माणूस अशी ओळख होती. त्यांच्या निधनामुळे राजकारणातील एक सर्वसमावेशक नेतृत्व हरपले आहे. तसेच, भाजपचेच नव्हे तर समाजाचे, महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे. पुण्यात भाजप वाढविण्यात त्यांचे मोठे योगदान होते. विरोधकांनाही आपलेसे करण्याची गिरीशभाऊ यांची हातोटी होती. कुठलाही राजकीय अभिनिवेश न ठेवता त्यांनी सर्वांनाच मदत केली.
देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री- खासदार गिरीश बापट हे एक अनमोल रत्न होते. पुण्याच्या जडणघडणीत त्यांचा वाटा मोठा आहे. नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, सलग पाच वेळा आमदार, खासदार, पालकमंत्री म्हणून त्यांनी केलेले काम पुणे कधी विसरु शकणार नाही. पक्षाच्या भिंतीपलीकडचे त्यांचे सर्व नेत्यांशी, पक्षांशी, समाजाशी त्यांचे चांगले संबंध होते. त्यांच्या जाण्याने भारतीय जनता पक्षाची, राजकीय आणि सामाजिक क्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे.
वंदना चव्हाण, खासदार- राष्ट्रवादी काँग्रेस- गिरीश बापट कामगार नेता ते खासदार असा प्रेरणादायी राजकीय प्रवास. सर्वसामान्य व्यक्ती ज्यांच्यापर्यंत सहज पोहचू शकेल असा खासदार. दांडगा जनसंपर्क, राजकारणातील मुत्सद्दी तरीही सर्व राजकीय पक्षातील लोकांशी राजकारणापलीकडील मैत्री जपणारा दिलदार मित्र, भावपूर्ण श्रद्धांजली.
अनिल शिरोळे, माजी खासदार- गिरीशराव बापट म्हणजे पुण्यातील भाजपचा चेहरा. ते अत्यंत मनमिळाऊ होते. सर्व राजकीय पक्षांमधील आणि समाजातील सर्व स्तरांमधील नेते, कार्यकर्त्यांशी त्यांचे चांगले संबंध होते. निवडणूक कशी लढवावी आणि कशी जिंकावी, हे त्यांच्याकडून शिकावे. त्यांच्या निधनामुळे समाजाची आणि पक्षाची मोठी हानी झाली आहे.
मोहन जोशी, उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी- माझे मित्र गिरीश बापट यांच्या निधनाने दुःख झाले. नगरसेवक, आमदार, मंत्री ते खासदार अशा राजकीय वाटचालीत त्यांनी कार्यकर्त्याचा पिंड सोडला नाही. राजकीय स्पर्धेत विरोधी पक्षांशी वितुष्ट असू नये, ही राजकारणातील चांगली भावना त्यांनी जपली. शहराच्या विकासात त्यांनी राजकारण आणले नाही. सर्वांना सोबत घेऊन जाणारा आनंदी वृत्तीचा उमदा मित्र हरपला.
रवींद्र धंगेकर, आमदार, कसबा मतदारसंघ- राजकीय प्रवासात समविचारी सर्वांना सोबत घेऊन काम केले. राजकीय स्तर कसा टिकवायचा हे त्यांच्याकडून शिकले पाहिजे. त्यांच्या पाऊलावर पाऊल टाकत मी विधानसभेत काम करेन. पक्ष चुकेल तेव्हा ते सूचना द्यायचे. जे समाजात बोलायचे तेच पक्षात बोलायचे. सर्व समाज त्यांच्यासोबत होता. त्यांचे काम पुढे घेऊन जाणे हीच त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल.
शहर
- Pune : कुठे आहेत ‘स्मार्ट’ प्रकल्प? स्मार्ट सिटी योजनेवर स्वयंसेवी संस्था आणि विरोधकांकडून प्रश्न
- Pune : सर्वांत महाग घरे लॉ कॉलेज रस्त्यावर, प्रतिचौरस फुटांसाठी १६ हजार ८१६ रुपये दर, कोरेगाव पार्कपेक्षा अधिक
- Mumbai : इगतपुरी-आमणे समृद्धी महामार्ग : लोकार्पणाआधीच महामार्गावरून अनधिकृतपणे वाहने धावू लागली
- Mumbai : मुंबईकरांवर कचरा शुल्काचा बोजा; १०० रुपये ते ७५०० रुपये आकारणार
महाराष्ट्र
- Ulhasnagar : खिडकीत बसलेली दोन मुले दुसऱ्या मजल्यावरून कोसळली; ग्रील तुटल्याने घडली घटना
- Santosh Deshmukh Case: धाराशिवच्या कळंबमध्ये कुजलेल्या अवस्थेत सापडला होता महिलेचा मृतदेह, बीड कनेक्शन आलं समोर
- Latur Crime : शिक्षकच बनला भक्षक! ३ महिन्यांपासून मुलांवर अनैसर्गिक अत्याचार
- Mumbai : निसर्ग उन्नत मार्गावर पर्यटकांची झुंबड, सर्व स्लॉट हाऊसफुल्ल
गुन्हा
- Mumbai Crime : खळबळजनक! मुंबईत ३८ दिवसांच्या बाळाची विक्री करण्यासाठी चोरी? पोलिसांनी असा उधळला चोरट्यांचा डाव
- Pune : शनिवार पेठेतून दुचाकी चोरणारा गजाआड, चोरट्याकडून दुचाकी चोरीसह घरफोडीचे गुन्हे उघड
- Pune Crime : टोळक्याकडून निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला मारहाण; तलवारी उगारुन घरातील साहित्याची तोडफोड
- Ghatkoper Crime : नकोशी! पाळण्याच्या दोरीनेच ४ महिन्याच्या लेकीचा बापाने जीव घेतला, घाटकोपर हादरलं
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- Kathua Encounter: जम्मू-कश्मीरमध्ये चकमक, 'जैश'च्या ५ दहशतवाद्यांचा खात्मा, ४ जवान शहीद
- Supreme Court : 'स्तन पकडणे बलात्कार नाही...', हायकोर्टाच्या या निर्णायावर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे
- CM Chandrababu Naidu : ‘तिरुपती मंदिरात फक्त हिंदूंनीच काम करावं’, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचं मोठं विधान
- Bill Gates : “भारत अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने विकसित होतोय”, बिल गेट्स यांच्याकडून कौतुक; म्हणाले, “नवनिर्मितीचं केंद्र…”