Eknath Shinde Maratha Reservation Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार काल (१८ नोव्हेंबर) थांबला असून आता सर्वांना मतदान व निवडणुकीच्या निकालाची प्रतीक्षा आहे. हरियाणाप्रमाणेच महाराष्ट्रात थेट दुरंगी लढत पाहायला मिळत आहे. दोन्ही राज्यांमधील फरक इतकाच की तिथे दोन पक्ष होते, महाराष्ट्रात मात्र दोन आघाड्या असून त्यामध्ये सहा प्रमुख पक्ष आहेत. तसेच निवडणुकीत इतर लहान पक्षांची भूमिका देखील निर्णायक असेल. हरियाणात भाजपा व काँग्रेस यांना ८० टक्के मते मिळाली. त्यामुळे तिसरा भिडू नगण्यच ठरला. आता महाराष्ट्रात दोन आघाड्यांतील सहा पक्षांमुळे उमेदवारीची संधी मिळाली नसल्याने बंडखोरांची संख्या यंदा अधिक आहे. ५० हून अधिक बंडखोर विविध मतदारसंघात उभे आहेत. मराठा आरक्षण, ओबीसी ध्रुवीकरण, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, पक्षफूट, स्थानिक निवडणुकांचा अभाव, पायाभूत सुविधांचा विकास या काही प्रमुख मुद्द्यांभोवती यंदाची निवडणूक होत आहे. यापैकी मराठा आरक्षणाचा प्रश्न सत्ताधाऱ्यांसमोरील मोठं आव्हान आहे.
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी करत मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या वर्षभरापासून आक्रमक आंदोलनं केली आहेत. मनोज जरांगे व त्यांच्या समर्थकांनी अनेकदा उपोषणं व ठिय्या आंदोलनं केली. प्रसंगी पोलिसांच्या लाठ्यादेखील खाल्ल्या. तरीदेखील त्यांनी आंदोलन मागे घेतलं नाही. परिणामी त्यांना राज्यभरातून पाठिंबा मिळू लागला. त्यामुळेच महायुती सरकारला त्यांच्या आंदोलनाकडे लक्ष द्यावं लागलं. जरांगे यांच्या मागणीनंतर महायुती सरकारने कुणबी नोंदी असलेल्या मराठा कुटुंबांना कुणबी जातप्रमाणपत्र देणार असल्याचं जाहीर केलं. तशी प्रक्रिया देखील सुरू केली होती. मात्र, ती प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे जरांगे यांनी त्यांचं आंदोलन अधिक तीव्र केलं. या काळात मनोज जरांगे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये टोकाचा संघर्ष पाहायला मिळाला.
Maharashtra :“अनिल देशमुखांनी स्वत:च स्वत:वर हल्ला करुन घेतला”; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप; म्हणाले… |
एकनाथ शिंदेंची भूमिका काय?
आता राज्यात निवडणुका होत आहेत. निवडणुकीनंतर जे सरकार सत्तेत बसेल ते तरी मनोज जरांगे यांची मागणी पूर्ण करेल का असा प्रश्न सर्वांना पडला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर भाष्य केलं आहे. शिंदे यांनी साम मराठी या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत यावर प्रतिक्रिया दिली. महायुतीचं सरकार आलं तर मनोज जरांगे यांनी केलेल्या मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीबाबत काय विचार कराल? असा प्रश्न शिंदे यांना विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले, “कायद्याच्या निकषात व कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे. मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे इतर समाजांवर अन्याय करण्याची आवश्यकता नाही”.
मराठा आरक्षण आंदोलकांचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी समाजाला शिक्षण तसेच नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची मागणी केली आहे. तसेच सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावीत यासाठी आंदोलन केले. सरकारने सरसकट देणे शक्य नसल्याचे सांगत, मराठवाड्यात या समाजाला निजामकालीन दाखले असलेल्यांना हे प्रमाणपत्र देण्यास सुरुवात केली. जरांगे मागण्यांवर ठाम आहेत. लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात महायुतीला पर्यायाने भाजपला याचा फटका बसला. त्यांची या विभागात एकही जागा आली नाही. जवळपास २८ टक्के मराठा समाज राज्यात आहे. जरांगे यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये सातत्याने भाजपाला लक्ष्य केलं. यामुळे विधानसभेला मराठवाड्यातील ४६ जागा महायुतीसाठी आव्हानात्मक ठरू शकतात. हरियाणात २२ टक्के जाट समाज भाजपाविरोधात जाईल अशी अटकळ बांधली गेली. त्याला उत्तर देण्यासाठी भाजपाने इतर मागासर्गीय समाजाची मोट बांधली. अर्थात काही सर्वेक्षणांनुसार हरियाणात भाजपाला जाट समुदायाची २३ टक्के मते मिळाली, तर काँग्रेसला ५५ टक्क्यांच्या आसपास ही मतं मिळाली. आता महाराष्ट्रात हा मुद्दा प्रभावी ठरणार काय? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
शहर
- Navi Mumbai : नवी मुंबईत आज पाणीबाणी, कोण कोणत्या भागात पाणीपुरवठा बंद?
- Gaja Marne : गजा मारणेला जेलमध्ये नेताना मटण पार्टी, ढाब्यावर 'ते' ३ लोकंही उपस्थित
- Pune Crime : पत्रकार असल्याची बतावणी करत सलून मालकांना ब्लॅकमेल, पुण्यातील मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; पिता-पुत्राचा कांड
- Pimpri Chinchwad : इंद्रायणी नदीच्या पूररेषेतील बेकायदा २९ बंगले पाडण्यावर शिक्कामोर्तब; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
महाराष्ट्र
- Sakri News : अवकाळीने संसार उघड्यावर; पडलेले घर पाहून महिलेचे अश्रू अनावर
- Wardha : बांधकाम करताना विहीर खचली; मलब्याखाली दबून एकाचा मृत्यू, दोन मजूर जखमी
- Akola : कर्जमाफीसाठी वंचित शेतकरी उच्च न्यायालयात; आठ वर्षांपासून प्रतीक्षा
- Solapur Accident : अपघाती निधन झालेल्या वडिलांचा अंत्यविधी उरकला, परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं; भीषण अपघातात मुलाचा मृत्यू
गुन्हा
- Crime News : दारूच्या नशेत चेष्टामस्करी; सहकारी दोन कामगारांची शस्त्राने वार करत हत्या
- Pune Crime : प्रेमाच्या जाळ्यात विवाहित महिलेला अडकवलं, नंतर वेश्याव्यवसायात ढकललं; पोलीस कर्मचाऱ्यानेही अब्रु लुटली
- Pune : समाज माध्यमातील ओळखीतून तरुणीवर बलात्कार; हडपसर पोलिसांकडून एकाविरुद्ध गुन्हा
- Pune : पाषाण भागात टोळक्याकडून वाहनांची तोडफोड- चौघांविरुद्ध गु्न्हा
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Operation Sindoor : पाकिस्तानच्या गोळीबारात राजौरीचे अतिरिक्त जिल्हा आयुक्त राजकुमार थापा शहीद, दोन नागरिकांचाही मृत्यू
- India Pakistan Tensions : पाकिस्तानकडून ३६ ठिकाणं निशाण्यावर, ४०० ड्रोनने हल्ला, धार्मिक स्थळांना टार्गेट
- Pakistan : पाकिस्तानचे २ तुकडे होणार! बलुच नेत्याकडून संयुक्त राष्ट्रांकडे स्वतंत्र देश करण्याची मागणी
- India Pakistan War : आमचा काही संबंध नाही..., पाकिस्तानला अमेरिकेचा दणका, भारताला दिला पाठिंबा