Congress : राजधानी दिल्लीमध्ये काँग्रेसला सलग दिसऱ्यांदा पराभवाचा सामना करावा लागला. विधानसभेच्या ७० जागांपैकी काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही, त्यामुळे आपच्या पराभवापेक्षा काँग्रेसच्या भोपळ्याची सर्वात जास्त चर्चा राजधानीमध्ये होत आहे. सत्ताधारी आप, काँग्रेस आणि भाजप अशी तिहेरी लढत पाहायला मिळाली.
२७ वर्षांनतर दिल्लीत भाजपचं कमळ फुललेय. तर १० वर्षानंतर केजरीवाल यांच्या आपच्या झाडूचा सुपडा साफ झालाय. २०१३ मध्ये अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचे तख्त जिंकले, त्यावेळी काँग्रेसची सत्ता होती. त्यानंतर मात्र काँग्रेसला पुन्हा दिल्ली काबिज करता आली नाही. इतकेच काय तर साधा एक आमदारही निवडून आला नाही. त्यामुळे दिल्लीमध्ये गणित नेमकं कुठं चुकतेय? त्याचं काँग्रेसकडून सिंहावलोकन व्हायलाच हवं.
काँग्रेस आणि आम आदमी पक्षानं स्वतंत्र विभानसभा निवडणूक लढवली होती. तिहेरी लढतीचा फायदा भाजपला झाला असल्याचं बोललं जात आहे. आप पक्षातील नेत्यांनाही काही जागांवर जबरदस्त फटका बसला आहे. मुख्य म्हणजे आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांचाही नवी दिल्लीत ३,१८२ मतांनी पराभव झाला आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकींचा आजवरचा इतिहास पाहता २०१३ सालापासून काँग्रेसचा दारूण पराभव झाला आहे. २०१३ साली काँग्रेसने ८ जागांवर विजय मिळवला होता. तर, २०१५ सालच्या विधानसभा निवडणुकीत ८ जागांवर काँग्रेसनं आपला गढ राखला होता. २०२० सालीही ६७ जागांवर निवडणूक लढवूनही काँग्रेसचा सुपडा साफ झाला होता. यंदाच्या २०२५ च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं ७० जागांवर निवडणूक लढवली. मात्र, यंदाही काँग्रेसला भोपळा मिळण्याची शक्यता आहे.
Beed News : बीडमध्ये भररस्त्यावर हल्ला, डोळ्यात मिरची पावडर आणि कात्रीनं सपासप वार |
काँग्रेसनं दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी कोणत्या उपाययोजना आखल्या?
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कंबर कसली होती. दिल्लीकरांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेसने अनेक आश्वासनं दिली होती. प्यारी दीदी योजना, जीवन रक्षा योजना, महागाई मुक्ती योजना, मोफत वीज योजना आणि बेरोजगार तरूणांना दरमहा ८,५०० रूपये देणार असल्याचं आश्वासनही काँग्रेसकडून देण्यात आलं होतं. मात्र, काँग्रेसने दिलेल्या आश्वासनांचा आणि प्रचाराचा काँग्रेसला काडीमात्र फायदा झालं नसल्याचं चित्र स्पष्ट आहे.
दिल्लीकरांचा विश्वास काँग्रेसवरून का उडाला?
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता अण्णा हजारे यांनी २०११ साली लोकपाल बिलसाठी उपोषण केलं होतं. त्यावेळी अरविंद केजरीवाल अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला सहभागी झाले होते. केजरीवाल यांनी काँग्रेसच्या मुख्यमंत्री यांच्यावर अनेक आरोप केले होते. तेव्हापासून अरविंद केजरीवाल प्रकाशझोतात आले. त्यानंतर त्यांनी आम आदमी पक्षाची स्थापना केली आणि सत्तेत आपली जागा तयार केली.
भाजपनं दिल्लीत झेंडा रोवला
२७ वर्षानंतर भाजप दिल्लीत सत्ता स्थापन करणार आहे. १९९८ साली भाजपची सत्ता होती. सुषमा स्वराज या दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या. त्यानंतर काँग्रेसच्या शीला दीक्षित यांची दिल्लीवर पकड होती. २०१५ साली दिल्लीला नवा चेहरा मिळाला. आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांनी जवळपास १० वर्ष मुख्यमंत्री म्हणून भूषवली. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने मुसंडी मारत ४८ जागा जिंकल्या.
शहर
- Pune Crime : माझ्या आईला पप्पांनीच मारलं; राकेशनं बबीताला का मारलं? पुण्यातील दुचाकीवरील मृतदेहाचं गूढ उलगडलं
- Kalyan Rain: कल्याणमध्ये वादळी वाऱ्याचा फटका, रिक्षावर झाड कोसळलं; ३ जणांचा दुर्दैवी मृत्यू
- Pimpri Accident : कोथिंबीर आणायल गेला अन् परत आलाच नाही, भरधाव जेसीबीनं चिमुकल्याला चिरडलं
- Pune News : दारू वेळेवर न आणून दिल्याचा वाद विकोपाला, काका- पुतण्यानं एकाला जागीच संपवलं; पुण्यात खळबळ
महाराष्ट्र
- Jalgaon Corporation : जळगाव महापालिका निवडणूक नोव्हेंबरमध्येच शक्य; प्रभाग रचना, आरक्षण सोडतनंतरच ठरणार कार्यक्रम
- Mumbai Local : मुंबईत वरुणराजा अवकाळी बरसला, रस्त्यावर पाणी, लोकलचा खोळंबा; चाकरमान्यांचा वेट अँड वॉच
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर अवकाळीचे संकट, मुंबईसह ८ जिल्ह्यांना गारपिटीचा इशारा, IMD चा अलर्ट
- Accident News : वाहनाच्या धडकेत २० फूट फेकले गेले; मुलाचा मृत्यू, वडील गंभीर जखमी
गुन्हा
- Pune Crime : प्रेमाच्या जाळ्यात विवाहित महिलेला अडकवलं, नंतर वेश्याव्यवसायात ढकललं; पोलीस कर्मचाऱ्यानेही अब्रु लुटली
- Pune : समाज माध्यमातील ओळखीतून तरुणीवर बलात्कार; हडपसर पोलिसांकडून एकाविरुद्ध गुन्हा
- Pune : पाषाण भागात टोळक्याकडून वाहनांची तोडफोड- चौघांविरुद्ध गु्न्हा
- Mumbai : थंड पाणी देण्याच्या बहाण्याने घरी बोलावलं, ५५ वर्षीय नरधमाकडून ४ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार; बोरिवलीत खळबळ
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Operation Sindoor : भारताचा जबरदस्त एअर स्ट्राईक; दहशतवादी मौलाना मसूद अजहरचा मदरसा उद्ध्वस्त, 'जैश'चे मुख्यालयही नष्ट
- Operation Sindoor: एअर स्ट्राइकनंतर अवघा देश भारतीय लष्कराच्या पाठीशी एकवटला, सर्वच स्तरातून ‘जय हिंद’चा जयघोष!
- Operation Sindoor : पाकिस्तानची नजर मॉक ड्रिलवर; भारताने रात्री दीड वाजता केला एअर स्ट्राईक
- Operation Sindoor : १-२ नाही तर ९० दहशतवादी मारले गेले, ऑपरेशन सिंदूरमुळे घाबरला पाकिस्तान