Bharat Bandh : आज भारत बंद! ६०० जिल्ह्यांवर परिणाम; शाळा ते बँक, काय सुरू, काय बंद? वाचा A टू Z माहिती

image

महाराष्ट्रात कामगार, कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वाखाली इंटक, भारतीय कामगार सेना, आयटक, एचएमएस, सीटीयू, एनटीयूआय,एआयसीसीटीयू, एआयआयईए, एआयबीईए, बीईएफआय, राज्य सरकारी कर्मचारी महासंघ, कामगार एकता, श्रमिक एकता मंच, स्वतंत्र फेडरेशनसह महाराष्ट्रातील २०हून अधिक संघटनांनी (Maharashtra strike news today) भारत बंदला पाठिंबा दिल्या. मिळालेल्या माहितीनुसार, देशभरातील ३० कोटींहून अधिक कामगार या संपात सहभागी होऊ शकतात. त्यामुळे बँका, सरकारी कार्यालये, बाजारपेठा आणि वाहतूक सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. कामगार संघटनांच्या मते, या संपाचा परिणाम ६०० हून अधिक जिल्ह्यांमधील कामकाजावर होईल. गेल्या वर्षीच्या आंदोलनादरम्यान सुमारे ५५० जिल्ह्यांपेक्षा जास्त ठिकाणी परिणाम झाला होता.(Bharat bandh on February 12: Banks, transport, offices - what will be open and what will shut during nationwide strike)



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *