Aurangabad Airport Renamed : औरंगाबाद विमानतळाचे नाव बदलावं, उद्धव ठाकरे यांचं ज्योतिरादित्य शिंदे यांना पत्र

Aurangabad Airport Renamed : अयोध्येतील विमानतळाचे महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण केल्याने उद्धव ठाकरे यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना पत्र लिहीत त्यांचं कौतुक केलं आहे. तसेच औरंगाबाद विमानतळाचे छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे नामकरण कधी होणार याबाबत प्रश्न विचारला आहे.

ज्योतिरादित्य शिंदे यान लिहिलेल्या पत्रात उद्धव ठाकरे म्हणाले आहेत की, ''अयोध्येतील विमानतळाचे महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण करण्याचे आम्ही मनापासून स्वागत करतो. या विमानतळामुळे प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद घेण्यासाठी जगभरातील यात्रेकरूंना अयोध्येला सहज पोहोचता येईल.''

Narendra Bhondekar : आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात

ते म्हणाले, त्याचप्रमाणे मोपा, गोवा येथील विमानतळाला 'मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ' असे नाव देण्यात आले आहे, ज्यामध्ये भाजपचे कार्यकर्ते व गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचा उल्लेख आहे. या नावांचे नामकरण स्वागतार्ह असले तरी, अत्यंत नम्रतेने आपल्या निदर्शनास आणून देणे आमचे कर्तव्य आहे की, महाराष्ट्रात मविआ सरकारने २ विमानतळांच्या नामकरणास मान्यता दिली होती आणि केंद्र सरकारच्या मान्यतेसाठी पाठवली होती. यात औरंगाबाद विमानतळाचे छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे नामकरण, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे श्री दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण आम्ही प्रस्तावित केले होते.'', असं ते पत्रात म्हणाले आहेत. 

यात त्यांनी पुढे लिहिलं आहे की, ''आम्ही हे २ प्रस्ताव अनुक्रमे २०२० आणि २०२२ मध्ये पाठवले असताना, आम्हाला विविध स्तरांवरून सांगण्यात आले की, कोणत्याही व्यक्तींच्या नावावरुन नव्हे तर विमानतळ ज्या शहरांमध्ये आहेत. त्या शहरांवरून विमानतळांचे नामकरण करण्याच्या भारत सरकारच्या धोरणामुळे हा विलंब होत आहे.''

ठाकरे यांनी पत्रात लिहिलं की, ''भारतातील २ विमानतळांना २ व्यक्तींची नावे देण्यात आली आहेत, हे पाहून आम्हाला खरोखर आनंद झाला आहे आणि ह्या २ विमानतळांना लागू होणारे नियम आमच्या राज्यातील महाराष्ट्रातील २ विमानतळांना देखील लागू होतात का हे आम्ही जाणून घेऊ इच्छितो. महाराष्ट्र राज्याला गेल्या दशकभरात सतत अन्यायकारक वागणुकीचा सामना करावा लागला आहे. आम्ही विमानतळांना ज्या २ व्यक्तींची नावे दिली आहेत आणि केंद्र सरकारच्या मंजुरीसाठी पाठवली आहेत, त्यांना परिचयाची गरज नाही. तरीही, लाल फितीच्या कारभारामुळे होणारा विलंब चिंतेचे कारण वाटते आणि श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला अशा प्रकारे दुर्लक्षित केले जात असल्याचे पाहून दुःखही होते.''

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply