Arvind Kejriwal : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाकडून देशातील जनतेला १० गॅरंटी दिलीय. यासोबतच जनतेने आम आदमी पक्षाला केंद्रात निवडून दिल्यास देशाचा विकास १० वेगवेगळ्या मार्गांनी होईल, असा दावाही केजरीवाल यांनी केलाय. मुख्यमंत्री केजरीवाल हे एका पत्रकार परिषदेत बोलत होते. यासाठी १० हमीपत्रे सादर केली.
गॅरंटी -१ देणार २४ तास मोफत वीज
देशाची विजेची मागणी २ लाख मेगावॅट आहे. आमच्याकडे ३ लाख मेगावॅट वीजनिर्मिती करण्याची क्षमता आहे, मात्र खराब व्यवस्थापनामुळे वीजपुरवठा खंडित होतो. आपचे सरकार आल्यानंतर देशात वीज मोफत दिली जाईल. 1.25 कोटी रुपये खर्चून गरीबांना 200 युनिट वीज पुरवली जाईल. एका वर्षासाठी सव्वा लाख कोटी रुपये खर्च येईल, हा खर्च सरकार देणार तसेच गरिबांना २०० युनिट मोफत वीज देणार असल्याची घोषणा केजरीवाल यांनी केलीय.
Borivali News : मद्याची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; चार जणांना अटक |
दुसरी गॅरंटी
देशभरात प्रत्येक मुलाला मोफत शिक्षण दिले जाईल. सरकारी शाळांचा स्तर उंचावला जाईल. देशातील सर्व सरकारी शाळा उत्कृष्ट बनवण्यात येणार आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी ५ लाख कोटी रुपयांचा खर्च येईल. यासाठी दरवर्षी ५० हजार कोटी रुपये खर्च होईल. हा खर्च अर्धा केंद्र आणि अर्धा राज्य सरकार उचलणार आहे.
तिसरी गॅरंटी
देशभरात मोहल्ला क्लिनिक चालू केले जातील. उपचारांचा दर्जा जागतिक दर्जाचा असेल. जो काही खर्च असेल, तो सरकार उचलेल."
चौथी गॅरंटी
चीनने आपल्या देशाच्या जमिनीवर कब्जा केलाय. पण केंद्र सरकार हे वास्तव लपवत आहे. आपल्या सैन्यात खूप ताकद आहे. चीनच्या ताब्यातील भारतातील सर्व जमीन मोकळी केली जाईल. एकीकडे राजनैतिक पातळीवरही काम केले जाईल तसेच लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य दिले जाईल.
पाचवी गॅरंटी
अग्निवीर योजनेत नोकरी केल्यानंतर तरुणांना ४ वर्षांनंतर नोकरी सोडवी लागेल. यामुळे आपण लष्कराला कमकुवत करत असल्याची टीका अरविंद केजरीवाल यांनी केलीय. आप चे सरकार आल्यानंतर अग्निवीर योजना बंद केली जाईल.
६ वी गॅरंटी
शेतकऱ्यांच्या पिकांना निश्चित दर दिला जाईल. जर जनतेने त्यांना निवडून केंद्रात आणले तर आम आदमी पक्ष स्वामिनाथन आयोग लागू करेल. त्यानुसार शेतकऱ्यांना एमएसपी मूल्य दिले जाईल. याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.
सातवी गॅरंटी
केंद्रात सरकार स्थापन झाल्यास दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देऊ, अशी गॅरंटीही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिलीय.
आठवी गॅरंटी
वर्षभरात २ कोटी रोजगार निर्माण होतील. सर्व तरुणांना सरकारी नोकऱ्यांसाठी तयार केले जाईल. रिक्त जागा सोडल्या जातील आणि परीक्षा निष्पक्षपणे घेतल्या जातील, अशी गॅरंटी यांनी दिलीय.
९ वी गॅरंटी
भाजप एक वॉशिंग मशीन असून त्याला भरचौकात आणून तोडलं जाईल. प्रामाणिक लोकांना तुरुंगात पाठवलं जाईल आणि भ्रष्टाचाऱ्यांना वाचवण्याची योजना बंद पाडली जाईल. संपूर्ण देशाला भ्रष्टचारापासून मुक्त करू अशी गॅरंटीही केजरीवाल यांनी दिलीय.
१० वी गॅरंटी
भारत सरकार देशातील उद्योगपतींना मदत करेल. आपल्या देशातील अनेक बडे उद्योगपती आपले व्यवसाय बंद करून परदेशात गेलेत, यामुळे देशाचे नुकसान होतंय. जीएसटी पीएमएलएमधून बाहेर काढून ते सुलभ केले जाईल. कोणताही व्यवसाय करायचा असेल तर तो फारसा गुंतागुंतीचा बनवला जाणार नाही. इंडिया आघाडी आघाडीची चीनला व्यापारात मागे टाकण्याची योजना आहे.
शहर
महाराष्ट्र
- Santosh Deshmukh Case: धाराशिवच्या कळंबमध्ये कुजलेल्या अवस्थेत सापडला होता महिलेचा मृतदेह, बीड कनेक्शन आलं समोर
- Latur Crime : शिक्षकच बनला भक्षक! ३ महिन्यांपासून मुलांवर अनैसर्गिक अत्याचार
- Mumbai : निसर्ग उन्नत मार्गावर पर्यटकांची झुंबड, सर्व स्लॉट हाऊसफुल्ल
- Maharashtra Weather Update : हवामान खात्याकडून 'या' भागात गारपीटचा येलो अलर्ट, अवकाळीचे ढग कायम
गुन्हा
- Mumbai Crime : खळबळजनक! मुंबईत ३८ दिवसांच्या बाळाची विक्री करण्यासाठी चोरी? पोलिसांनी असा उधळला चोरट्यांचा डाव
- Pune : शनिवार पेठेतून दुचाकी चोरणारा गजाआड, चोरट्याकडून दुचाकी चोरीसह घरफोडीचे गुन्हे उघड
- Pune Crime : टोळक्याकडून निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला मारहाण; तलवारी उगारुन घरातील साहित्याची तोडफोड
- Ghatkoper Crime : नकोशी! पाळण्याच्या दोरीनेच ४ महिन्याच्या लेकीचा बापाने जीव घेतला, घाटकोपर हादरलं
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Supreme Court : 'स्तन पकडणे बलात्कार नाही...', हायकोर्टाच्या या निर्णायावर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे
- CM Chandrababu Naidu : ‘तिरुपती मंदिरात फक्त हिंदूंनीच काम करावं’, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचं मोठं विधान
- Bill Gates : “भारत अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने विकसित होतोय”, बिल गेट्स यांच्याकडून कौतुक; म्हणाले, “नवनिर्मितीचं केंद्र…”
- Vasanthy Cheruveetil : कुठल्याही प्रशिक्षणाशिवाय ५९ वर्षीय भारतीय महिलेने सर केलं एव्हरेस्ट, यूट्युबवरून घेतलेले धडे; पुढचं लक्ष्यही ठरवलं