
मुंबई : ‘मशाल भडकली, भगवा फडकला. चिन्ह कोणतेही असो, जनता आमच्याच बरोबर आह’, हे आजच्या निकालाने स्पष्ट केले, असे परखड मतप्रदर्शन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी येथे केले. विरोधकांना पराभवाचा अंदाज आल्यानेच त्यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचा टोलाही ठाकरे यांनी लगावला. तर आम्ही निवडणूक लढविली असती, तर आमचाच विजय झाला असता. आमच्या मदतीमुळेच ऋतुजा लटके यांना विजय मिळाला, असे मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी स्पष्ट केले.
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर लटके यांनी ज्येष्ठ नेते अॅड. अनिल परब यांच्यासह ठाकरे यांच्या ‘ मातोश्री ’ निवासस्थानी जाऊन भेट घेतली. विजयाबद्दल आनंद व्यक्त करून ठाकरे म्हणाले, लढाईची सुरुवातच विजयाने झाली आहे. ही लढाई वेगळी असल्याने शिवसेना कार्यकर्ते जोशात होते. पण आमचे पक्षाचे नाव आणि चिन्ह गोठविण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले आणि त्यांचे कर्ते करविते निवडणूक रिंगणात आलेच नाहीत. विरोधकांनी पराभव होईल, हे लक्षात आल्याने निवडणूकच लढविली नाही. लढत न झाल्याने शिवसेना कार्यकर्त्यांच्या उत्साहावर पाणी पडले.
विरोधकांनी निवडणूक लढविली असती, तरी निकालावर काहीही परिणाम झाला नसता. नोटा पर्यायाला जी मते पडली आहेत, तीच मते विरोधकांना पडली असती, असा टोलाही ठाकरे यांनी भाजपला लगावला. ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपवर जोरदार टीका केली. जमिनीवरचे प्रकल्प गुजरातला गेले आणि हवेतील प्रकल्प महाराष्ट्रात आले. गुजरातची निवडणूक जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांचे महाराष्ट्र प्रेम उफाळून आले आणि त्यांनी महाराष्ट्रासाठी काही हवेतील प्रकल्प देण्याची घोषणा केली, असा टोला ठाकरे यांनी लगावला.
भाजपचाच विजय झाला असता – शेलार
ऋतुजा लटके यांचा ५३ हजार ४७१ मतांनी विजय झाला. ऋतुजा लटके निवडून याव्यात, यासाठी भाजपने मदत केली व त्यांचा विजय सुकर झाला, असे सांगून मुंबई भाजप अध्यक्ष अॅड. आशीष शेलार यांनी लटके यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले. मात्र लटके यांना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाकप व अन्य पक्षांनी पाठिंबा देऊनही फारसे मतदान झाले नाही. भाजपने निवडणूक लढविली असती, तर लटके यांचा पराभव निश्चित होता, असे शेलार यांनी सांगितले. महाविकास आघाडीचा पाठिंबा लक्षात घेता लटके यांना किमान ९० हजाराहून अधिक मते मिळायला हवी होती. पण जनतेने त्यांच्याकडे पाठ फिरविली, असे मत शेलार यांनी व्यक्त केले.
रमेश लटके यांच्या कामांमुळे विजय – ऋतुजा लटके
रमेश लटके यांच्या कामांच्या पुण्याईचा हा विजय असल्याचे ऋतुजा लटके यांनी सांगितले. पोटनिवडणुकीत नेहमीच कमी मतदान होते. भाजपला जर आमच्याबाबत सहानुभूती असती, तर त्यांनी अर्जच भरला नसता. नोटा पर्यायाला जे मतदान झाले आहे, ते भाजपचेच असल्याचे सांगून निवडणुकीचा कौल लक्षात आल्यानेच त्यांनी माघार घेतली, असे लटके यांनी स्पष्ट केले.
नोटासाठी भाजपकडून प्रचार – अनिल परब
भाजपने मुरजी पटेल यांना माघार घेण्यास सांगितली आणि पडद्याआडून नोटा पर्याय निवडण्याबाबत प्रचारही केला, असा आरोप शिवसेना नेते अॅड. अनिल परब यांनी केला. पण तरीही लटके यांचा मोठय़ा मताधिक्याने विजय झाल्याने मुंबईकरांच्या मनात काय आहे आणि ते उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहेत, हे दिसून आल्याचे परब यांनी सांगितले. नोटाचा वापर ऐच्छिक असून त्याचा प्रचार करता येत नाही. पण पैसे देऊन प्रचार करण्यात आला आणि पोलीस व निवडणूक आयोगाकडे तक्रार करूनही कारवाई झाली नसल्याचे परब यांनी नमूद केले. मशाल चिन्ह मिळाल्यानंतर आमचा पहिला विजय असून महाविकास आघाडी एकत्र आली तर काय करू शकते, हे निकालातून स्पष्ट होत असल्याचेही परब यांनी सांगितले. या निकालाबाबत आत्मचिंतनाची गरज असल्याचे मत उद्योगमंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते उदय सामंत यांनी व्यक्त केले.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel

