Amol Kolhe: विलिनीकरणानंतर अमोल कोल्हे प्रदेशाध्यक्ष होणार होते, रोहित पवारांचा दावा कितपत खरा?, कोल्हे म्हणाले…

image

राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि खासदार अमोल कोल्हे यांनी साम टीव्हीला दिलेल्या 'ब्लॅक अँड व्हाईट' मुलाखतीमध्ये आमदार रोहित पवारांनी केलेल्या दाव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर अमोल कोल्हे प्रदेशाध्यक्ष होणार होते, असं विधान रोहित पवार यांनी केले. रोहित पवारांच्या या दाव्यावर बोलताना अमोल कोल्हे म्हणाले की, 'या सगळ्या गोष्टींवर मी आधीपण बोललो आहे. जे काही ठरले होते ते आता पब्लिक डोमेनवर बऱ्यापैकी आले आहे. आज रोहित पवारांनी सांगितलेली गोष्ट या आधी देखील पब्लिक डोमेनमध्ये आलेली आहे. या चर्चा झाल्या होत्या ही वस्तुस्थिती आहे की या चर्चा झाल्या होत्या. मी अगदी ठामपण सांगतो कारण मला आठवतंय १६ मेला बारामती ते पुणे हा प्रवास माझा दादांसोबत झाला होता. १६ मेपासून मी या प्रोसेसमध्ये आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची प्रचारसभा संपवून अजितदादा आणि मी सोबत प्रवास केला होता. हे जे काही टप्पे घडले आहेत विलिनीकरणासंदर्भात १४ बैठका झाल्या आहे. यातील ११ बैठका जयंत पाटील यांच्या घरी झाल्या. ही सगळी वस्तुस्थिती आहे. महत्वाची गोष्ट ही की, कालही आमच्या नेत्या सु्प्रिया सुळे यांनी देखील सांगितले की, ज्यांच्यासोबत चर्चा केली दुर्दैवाने ते आज आपल्यामध्ये नाहीत. काय चर्चा झाली होती?, कशासाठी चर्चा झाली होती? यासर्व गोष्टींविषयी बोलणं काही हशिल वाटत नाही.'



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *