Aditya Thackeray : 'भाजपने २ पक्ष फोडले, खोके सरकार डोक्यावर बसवलं..' पिंपरीच्या सभेत आदित्य ठाकरे बरसले

Aditya Thackeray : शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे हे आज पिंपरी चिंचवड शहर दौऱ्यावर आहेत. आदित्य ठाकरे यांचं पिंपरी चिंचवड शहरात शिवसैनिकांनी मोठी बाईक रॅली काढून जोरदार स्वागत केले. यावेळी पिंपरीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचा महा निष्ठा महा न्याय मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

Nagpur : लक्षावधी दीपज्योतींनी उजळणार ऐतिहासिक पोद्दारेश्वर राम मंदिर; शंखनाद, शिवमुद्राचाही होणार गजर

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

"फुले उधळून स्वागत करत असताना जेसिबीची भिती वाटते. जेसीबी अंगावर कोसळेल की काय असं वाटते. राजकारणात काटेदार खेकडे खूप असतात. मात्र हे जेसीबीचे खेकडे प्रेमाचे आहेत," अशी मिश्किल टिप्पणी आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणाच्या सुरूवातीला केली.

"आपण आज मोठ्या जिद्दीने, ताकदीने एकत्र आलो आहोत. गद्दारांसारखे आपल्या हातात खोके नाहीत, आपण कब्जा करुन बसलो नाही. आपल्या डोक्यात मस्ती, माज नाही. आपल्या ह्रदयात प्रेम आहे, आपल्याला एकत्र आणत आहे.." असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

भाजपने पक्ष फोडले..

"महाविकास आघाडीचं चांगलं चाललेल सरकार ह्यांनी गद्दारी करुन पाडलं आणि एक अवकाळी खोके सरकार डोक्यावर बसवलं. भाजपने दोन पक्ष फोडले, एक परिवार फोडला आणि खोके सरकार डोक्यावर बसवलं. एवढं सगळं करुन त्यांना खुर्च्या मिळाल्या, पण महाराष्ट्राला काही मिळालं का? नवा उद्योग राज्यात आला का?" असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply