Accident : काळजाचा थरकाप उडवणारा अपघात, मित्राच्या साखरपुड्याला निघाले, पण ३ मित्रांचा वाटेतच घात

image

एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, नवादा येथे झालेला हा अपघात इतका भीषण होता की, त्यावरून दुचाकीच्या वेगाचा अंदाज लावता येतो. विजेच्या खांबाला झालेल्या धडकनंतर दुचाकीवरील तिन्ही तरुणांचा जागीच अंत झाला. या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण गावात शोककळा पसरली. मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, सध्या लग्नसराईच्या काळात कार्यक्रमांना जाणारे तरुण मोठ्या प्रमाणात मद्यपान करत आहेत. अनेकदा मद्याच्या नशेत गाडी चालवल्यामुळेच असे गंभीर अपघात घडत असल्याचे बोलले जात आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *